नागपूर, दि. 15: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 निर्भय, शांततामय, न्याय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याकरीता निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणतीही अनूचित घटना घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, यासाठी नागपूर ग्रामीण व जिल्ह्यात 27 मे 2019 पर्यंत परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे दारुगोळा स्वत: जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आलेले आहे. परंतु अशा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील शस्त्रांचा गैरवापर होणार नाही, यांची संपूर्ण जबाबदारी संबंधीत बँका, संस्थेच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे.
छाननी समितीच्या 23 फेब्रुवारीच्या सभेत परवानाधारक व्यक्तींना निवडणूक कालावधीत स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची, वाहून नेण्याची आवश्यकता असेल अशा व्यक्तींनी वरीलप्रमाणे आदेश निर्गमित झाल्यापासून 10 दिवसांत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर यांच्या समक्ष विनंती अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीकांत फडके यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment