Wednesday, 30 January 2019

बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेची कामे तत्काळ पूर्ण करा - सदाभाऊ खोत


मुंबई, दि. 30 : बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेची कामे तत्काळ पूर्ण करा, असे निर्देश पाणी पुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज संबंधित अधिकऱ्यांना दिले.
 चिखली तालुक्यातील मौजे आन्वी व पळसखेड जयंती येथील पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देऊन काम सुरु करण्याबाबत तसेच बुलडाणा जिल्ह्यातील खारपाण पट्टयातील क्षारयुक्त पाणी पुरवठा होत असलेल्या गावात योग्य उपाययोजना करण्याबाबत तसेच फिल्टर बसवून शुध्द पाणी पुरवठा होण्याबाबत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनात बैठक पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते.
          यावेळी बुलडाणा जिल्हयातील आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर, आमदार शशीकांत खेडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्य अभियंता, चंद्रकांत गजभिये तसेच आदी अधिकारी उपस्थित होते. 
          श्री. खोत म्हणाले, मौजे आन्वी व पळसखेड जयंती येथील पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सात दिवसात सादर करा. तसेच बुलडाणा जिल्ह्यात शुध्द पाणी पुरवठा होण्यासाठी फिल्टर बसविण्यात आले आहेत. यापैकी बरचेसे फिल्टर बंद असून शुध्द पाणी पुरवठा करण्यास अडचणी  निर्माण होत आहेत. यामुळे फिल्टर बसविलेल्या कंपनीवर तात्काळ कारवाई करावी. याबाबतचा प्रस्ताव शासनास  सादर करावा.
यावेळी जळगाव जामोद येथील १४० गावे पाणी पुरवठा योजनेसाठी जास्तीचे अभियंता व कर्मचारी नेमणूक करण्याच्या सूचना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
००००

No comments:

Post a Comment