Sunday, 17 May 2026
१८ मे #दिनविशेष
Friday, 15 May 2026
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांची जिल्हा प्रशासनाला सूचना अल निनोचा नैऋत्य मोसमी वाऱ्यावर परिणाम विभागात सरासरीच्या 92 टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान
नागपूर
दिनांक 15: अल निनो मुळे मान्सून हंगामात 92 टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची
शक्यता असली तरी विभागात अतिवृष्टी व पुरामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा
स्तरावर आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
यांनी दिले आहेत.
मान्सूनपूर्व
करावयाच्या उपाय योजना संदर्भात विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी आढावा घेतला त्याप्रसंगी
मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
विभागीय
आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस विभागातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य
कार्यकारी अधिकारी तसेच जलसंपदा, ग्रामविकास, कृषी, आरोग्य विभागाचे अधिकारी दुरदूष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
यावेळी
महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटणकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पुनर्वसन सह आयुक्त विजया बनकर, अतिरिक्त
जिल्हाधिकारी प्रविण महीरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ
बालसुब्रमणियम, डॉ. प्रविण कुमार, कर्नल रविकांत व विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे
आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विभागात दिनांक 10 ते 15 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होत असल्याचे हवामान विभागाने कळविले असून गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यामध्ये विदर्भातील सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविले जाणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी कोरडे कालखंड निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टीची शक्यता तसेच पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विभागात असलेल्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाकडे असलेल्या बोटीसह इतर साहित्य सज्ज ठेवण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या.
वैनगंगा,
कन्हान,पेंच नदी खोरे पुरासाठी अत्यंत संवेदनशील आहेत. चोराई प्रकल्पातून सोडलेले पाणी
वैनगंगा नदीवरील प्रकल्पात पोहोचण्यासाठी 39 तासापेक्षा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे
नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्यासंबंधीची यंत्रणा सज्ज ठेवावी. आंतरराज्य प्रकल्पासंदर्भात
समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशा सूचना श्रीमती बिदरी यांनी यावेळी केल्या.
आपत्ती
व्यवस्थापना संदर्भात संपर्क यंत्रणा सज्ज राहावी, तसेच नागरिकांना अतिवृष्टी व पुराच्या
संदर्भातील अलर्टची माहिती मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात यावेत. तसेच नागरिकांनाही आपत्ती संदर्भात माहिती देण्यासाठी विभागात चॅटबॉट सुरू करण्यात आले आहेत, सर्व जिल्हा प्रशासनाने
आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत चार्ट पोट सुरू करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
अतिवृष्टी
व पुरामुळे ज्या गावातील नागरिकांचे स्थलांतरित करावे लागते या संदर्भात मागील तीन
वर्षाचा आढावा घेऊन अशा संवेदनशील क्षेत्राची ओळख निश्चित करावी तसेच या क्षेत्रात
राहणाऱ्या महिलांच्या आरोग्य व गर्भवती महिलांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांना तात्काळ
मदत कशी उपलब्ध होईल याची नियोजन करावे, अशा गावांमध्ये पुरेसे औषध अन्नधान्य तसेच सर्पदंशावरील
औषधे व साप पकडणारी यंत्रणा तयार करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पामध्ये सरासरी 43% जलसाठा उपलब्ध असून पिण्याचे पाणी औद्योगिक वापर व खरीप हंगामासाठी 31 ऑगस्ट पर्यंत पुरेसा पाणीसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून ज्या भागांमध्ये पावसाचा खंड निर्माण होण्याची शक्यता आहे अशा भागांना पाणीपुरवठा करण्यात संदर्भात नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
धोकादायक स्थळांवर
माहिती फलक लावा
सिंचन प्रकल्प तसेच विभागातील नद्यांवरील धोकादायक स्थळांची माहिती घेऊन अशा ठिकाणी वारंवार दुर्घटना होणार नाही. यासाठी माहिती फलक लावण्यात यावेत व अशा ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा ठिकाणी मनुष्यहानी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे यावेळी विभागीय आयुक्तांनी सुचित केले.
केंद्रीय जल आयोगाकडून एक जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत
विभागात निर्माण होणारी पूरस्थिती तसेच धोकादायक पातळी संदर्भात पूर्ण नियंत्रण कक्ष
कार्यरत राहणार असून दररोज पुर बुलेटिन स्थिती अहवाल आधी माहिती जिल्हा प्रशासन पोलीस
प्रशासन व संबंधित अधिकारी यांना नियमित देण्यात यावी असेही अशी सूचना यावेळी करण्यात
आली.
नागपूर
शहरातील नैसर्गिक आपत्ती उपाय योजना अंतर्गत नाग नदी पिवळी नदी कोरा नदी तसेच शहरातील
227 नाले यांची तपासणी करण्यात आली असून गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात
आले आहे. शहरातील पुराच्या पाण्याला अडथळा निर्माण होणार नाही. या दृष्टीने नियोजन करण्यात
आले असून शहरातील खोलगट भागात अतिवृष्टीच्या काळात ड्रोन चा वापर करण्यात येणार असल्याचे
महापालिका आयुक्त डॉ बिपिन इटनकर यांनी सांगितले.
विभागातील
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलसंपदा विभाग आरोग्य विभाग
व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष द्वारे करण्यात आलेल्या मान्सून पूर्व व्यवस्थेची
माहिती सादरी करण्यात आले यावेळी देण्यात आली.
########
उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा अलर्ट सकाळी 11 ते 4.30 वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी नाही विद्यार्थी कामगार व नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने उपाययोजना करा विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या सूचना नागपूर व वर्धा जिल्ह्यात 16 ते 18 पर्यंत यलो अलर्ट
नागपूर
दिनांक 15 : हवामान विभागाने विभागातील
नागपूर वर्धा जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट ( हिट वेव्ह ) च्या पार्श्वभूमीवर येलो
अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी
कामगार व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी
यांनी केले आहे.
सध्या तापमानात
मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उष्णतेची लाट विभागासह नागपूर वर्धा जिल्ह्यात त्याची
तीव्रता अधिक असल्याचे जाहीर केले असून विभागात
करायच्या उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय
आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
हवामान
विभागाच्या हिट वेव्ह संदर्भात सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत नागरिकांच्या
संरक्षणासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये तसेच विद्यार्थी कामगार व नागरिकांच्या
सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व आस्थापना व महाविद्यालयांनी आवश्यक उपाययोजना कराव्या
असे सक्त निर्देश यावेळी देण्यात आले.
आपत्ती
व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सर्व जिल्हाधिकारी यांनी हिट वेव्ह उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात
उपायोजना राबवताना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोल्ड वार्ड तयार करावे तसेच
उष्णतेवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधीचा साठा तयार ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या
विभागात
मे व जून महिन्यात उष्णते संदर्भात अलर्ट लागू राहणार आहे उष्माघातामुळे विभागात अतिदक्षता
घेताना उष्मगाथाच्या रुग्णांवर प्राप्त तात्काळ उपचार होईल याची खबरदारी घेण्यात यावी
उष्मघातासंदर्भात करावयाचे उपाय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती
करावी तसेच महानगरपालिका क्षेत्रात सेंटर होम सारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
असेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले.
नागपूर
व चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात यासंदर्भात उपाय योजना लागू करण्यात आल्या असून
नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक चौकात क्रीमनेट तसेच आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा
शाळा महाविद्यालय कोचिंग सेंटर आदींना सूचना देण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर
बीपी नितळकर यांनी यावेळी सांगितले.
नागपूर
जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात उपाय योजना लागू करण्यात आल्या असून या उपायोजना
16 जून पर्यंत लागू राहतील असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत सांगितले
या बैठकीस वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली तसेच गोंदिया जिल्हा धिकारी मुख्य कार्यकारी
अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दूरदृष्टी प्रणाली द्वारे जिल्ह्यात सुरू असलेल्या
उपायोजनाबद्दल माहिती दिली.
******
Thursday, 14 May 2026
१५ मे #दिनविशेष
साहित्य मीमांसक,कवी व विचारवंत #रामचंद्रश्रीपादजोग यांचा जन्मदिन.'अभिनव काव्यप्रकाश' हा त्यांचा पहिला ग्रंथ. 'ज्योत्स्रागीत','निशागीत','साराच वेडेपणा' आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.त्यांच्या ग्रंथांतून कला व साहित्याविषयीचे तत्वज्ञान प्रकट होते.






