Monday, 11 May 2026

विभागीय लोकशाही दिनात नव्याने एक तक्रार दाखल


नागपूर, दि.११ : विभागीय लोकशाही दिनात आज गोंदिया जिल्ह्यातील गावठाण जमीन अधिग्रहणासंदर्भातील तक्रार नव्याने दाखल झाली. या प्रकरणात गोंदिया जिल्हाधिकारी यांचा अहवाल मागविण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सह आयुक्त रोहयो अविनाश हदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विभागीय लोकशाही दिनात नव्याने एक तक्रार प्राप्त झाली. तसेच चंद्रपूर मनपा हद्दीतील तक्रारीबाबत मनपाकडून अहवाल प्राप्त झाला. यावेळी महिला व बालविकास, कृषी, पोलीस, जलसंपदा, कामगार, भूमी अभिलेख आदी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

                        


गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पोस्ट अंजोरा अंतर्गत येणाऱ्या भाजेपार गावातील दोन नागरिकांची जमीन गावठाण प्रयोजनासाठी अधिग्रहीत करण्यात आली असून यामुळे ते भूमिहीन झाल्याने शासनाने ही जमीन त्यांना परत करावी अशी तक्रार त्यांनी केली आहे. या प्रकरणी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविण्याचे निर्देश सह आयुक्त अविनाश हदगल यांनी दिले. 

विभागीय लोकशाही दिनात यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजीची चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील एक तक्रार प्राप्त झाली होती. महापालिकेच्या जागेवर अवैध बांधकाम करून अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याच्या तक्रारीबाबत मनपाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज मनपाकडून या प्रकरणात कार्यवाही अहवाल सादर करण्यात आला.

00000



 

सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सिंधी समाज बांधवांना मालकी पट्ट्यांचे वाटप,

 समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

        नागपूर, दि. १० - निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या  सिंधी समाजाने शून्यापासून सुरुवात केली. आज देशाच्या व्यापार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये हा समाज आघाडीवर असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
                                    

         विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या वतीने जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात सिंधी बांधवांना मालकी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. तसेच समाजातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर भगवानदास सवनानी, आमदार कुमार आयलानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय संरक्षक घनश्याम कुकरेजा, सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनकी रूघवानी, संयोजक वीरेंद्र कुकरेजा, सचिव पि.टी. दारा आदी उपस्थित होते. यावेळी ३६ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यापैकी १२ नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात करण्यात आला.
                                            
                                            

        मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशाच्या फाळणीनंतर या समाजाला घर, शेती, व्यापार सोडून विस्थापित होऊन भारतात यावे लागले. त्याचप्रमाणे अनेक वर्ष या समाज बांधवांना निर्वासितांच्या शिबिरामध्ये घालवावी लागली. समाजाने आपले दुःख हे  संघर्षाचे शस्त्र बनवले. आज हा समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर असून  देशाच्या विकासात अत्यंत मोलाचे योगदान देत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
                                                

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे  देशभरात अभियान राबवले गेले. सिंधी बांधव वास्तव्यास असलेल्या जमिनी अतिक्रमण ठरत होत्या. त्यामुळे सिंधी बांधवांना मालकी पट्टे मिळावे , अशी मागणी सुरू होती. संधी मिळताच आम्ही या प्रश्नावर तोडगा काढला आणि सिंधी बांधवांना वर्ग एकच्या शंभर टक्के मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
                                                
        आगामी काळातही अत्यंत वेगाने  या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. तसेच उल्हासनगर येथील सिंधी बांधवांसाठी वेगळ्या पद्धतीने नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.
विनकी रुघवाणी यांनी प्रास्तविक केले. विकी कुकरेजा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

                                                
        *३५० सिंधी बांधवांना पट्टे वाटप

        भारताच्या फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या सिंधी विस्थापितांचे नागपूर जिल्ह्यातील खामला, मेकोसाबाग व जरीपटका या भागात पुनर्वसन करण्यात आले.या तीन वसाहतींना अधिकृत विस्थापित वसाहतीचा दर्जा देण्यात आला. अनेक विस्थापित कुटुंबे मागील 70 ते 75 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांनी नागपूर शहराच्या आर्थिक, सामाजिक व व्यापारी विकासात मोठे योगदान दिले. आज 350 सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारा जणांना प्रातिनिधिक स्वरूपात पट्टे वाटप करण्यात आले.


 

Sunday, 10 May 2026

सोमनाथ गौरवशाली विरासत के ७५ साल…


 

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में यह पवित्र भूमि भारत के सांस्कृतिक पुनर्जागरण की गौरवशाली साक्षी बन रही         है।

    इस स्वर्णिम क्षण के साक्षी बनें...

    कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्र का सामूहिक जाप, सोमनाथ से संबंधित कथाओं का कथन आदि कार्यक्रमों     का समावेश...

    🗓️ ८ से ११ मई २०२६

    📍 श्री सोमनाथ मंदिर परिसर, प्रभास पाटण

    #सोमनाथ_स्वाभिमान_पर्व

#Somnath 75 Years of Glorious Heritage...


     Under the leadership of Prime Minister Narendra Modi, this sacred land bears glorious witness to             India's cultural renaissance.

    Become a witness to this golden moment...

    Featuring programs like Kalash Yatra, Bhajan Sandhya, collective chanting of Omkar Mantra, narration     of Somnath-related stories, and more...

    🗓️ May 8 to 11, 2026

    📍 Shri Somnath Temple Complex, Prabhas Patan

    #Somnath_Swabhiman_Parv