Sunday, 16 August 2026

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती १५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा - स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती १५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा - स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन मुंबई, दि. १६ : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून १५ ते १९ ऑगस्टदरम्यान रील अपलोड करता येणार आहे मृद व जलसंधारण विभागाचे https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en , Facebook- https://www.facebook.com/mahawalkathon2026/,Twitter https://x.com/MahaWalkathon26 हे सोशल मीडिया अकाऊंट आहेत. स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करून आपल्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायची आहे. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे तसेच ‘#SaveSoilSaveWater’ हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी अधिकृत क्यूआर तयार करण्यात आला आहे. क्यूआर स्कॅन केल्यानंतर नोंदणी रील लिंक सबमिट - जिल्हा निवड→व्हेरिफिकेशन→ सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन तसेच गावातील यशस्वी मृद व जलसंधारणाची कामे या विषयांवर रील तयार करता येणार आहे. स्टोरीटेलिंग, ॲक्टिंग, म्युझिक, डान्स, ॲनिमेशन, शॉर्ट फिल्म, बिफोर-आफ्टर आणि ड्रोन व्हिज्युअल्स यांसारख्या सर्जनशील पद्धतींचाही वापर करता येणार आहे. मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक आहे. स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, प्रभावी सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता तसेच इन्स्टाग्राम एंगेजमेंट या निकषांवर करण्यात येणार आहे. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार नाही. तर संदेश महत्वाचा असणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्यांना ‘युवा मृद- जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. युवक, विद्यार्थी, इन्स्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले. ००००

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन नागपूर, दि. १५ - मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे ‘आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इनस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत राज्यातील युवक - युवतींनी उत्सफूर्त सहभागी घ्यावा, असे आवाहन करण्यात येतआहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. रील स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकांने Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे. रिल्स बनवण्यासाठी विषय माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत. रील्स करीता गुणांकन पद्धती पुढील प्रमाणे असणार आहे. विषय व संदेश - ३० गुण, कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश - २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता - १५ गुण, Instagram Engagement - १० गुण असे एकूण - १०० गुण असणार आहेत. केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल. विजेत्यांना बक्षीस राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे. "एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी !, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे. 0000

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन नागपूर, दि. १५ - शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व मा. महापौर / उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे. महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000

Friday, 14 August 2026

जलयुक्त महाराष्ट्र घडवूया!

जलयुक्त महाराष्ट्र घडवूया! महाराष्ट्रातील पाणीटंचाई, घटती भूजल पातळी आणि मातीची धूप यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मृद व जलसंधारण विभागाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांत भूजल पातळी खालावत असून पाणीटंचाईचे आव्हान निर्माण होत आहे. मोठ्या धरणांवरील अवलंबित्व कमी करून पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणावर भर देण्याची गरज शासन निर्णयात अधोरेखित करण्यात आली आहे. याच उद्देशाने माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र जलसंधारण चळवळीचा आधार मानण्यात आला आहे. त्यांच्या जलसंधारण क्षेत्रातील योगदानाच्या स्मरणार्थ २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माती आणि पाणी ही परस्परांशी जोडलेली नैसर्गिक संसाधने आहेत. शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा पाया असलेल्या या दोन्ही संसाधनांचे संरक्षण भविष्यातील पिढ्यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे केवळ सरकारी यंत्रणेपुरते मर्यादित न राहता नागरिक, युवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांचा सहभाग वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची थीम असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कमाल तीन किलोमीटरचे चालण्याचे आयोजन करून मृद व जलसंधारणाची शपथ घेतली जाणार आहे. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, NCC, NSS, युवा संघटना, स्वयंसेवी संस्था, खेळाडू, उद्योजक, कलाकार, सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. १५ वर्षे व त्यावरील पुरुष व महिला सहभागी होऊ शकतील. जिल्हाधिकाऱ्यांवर या उपक्रमाच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जलसंधारण सप्ताहात युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही राज्यव्यापी स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना ३० ते ६० सेकंदांच्या Instagram Reels तयार करून माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश देण्याची संधी मिळणार आहे. मातीची धूप रोखणे, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांवर रील्स तयार करता येणार आहेत. या स्पर्धेत विषय व संदेश, कल्पकता, सामाजिक परिणाम, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता तसेच सोशल मीडिया सहभागाच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. जलसंधारण अभियान २६ जानेवारी २०२७ पर्यंत सुरू राहणार असल्याने शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निबंध, चित्रकला, पोस्टर आणि वादविवाद स्पर्धांसोबत ‘एक शाळा-एक शोषखड्डा’ हा उपक्रम राबविण्याची सूचना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगणे, जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे आणि २१ ऑगस्ट रोजी मृद व जलसंधारणाची शपथ देणे यावरही भर आहे. अभियानाच्या कालावधीत ग्रामीण तसेच शहरी भागात जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देण्यात येणार आहे. मृद व जलसंधारणाच्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि जलपूजन, अमृत सरोवरांना भेट, तलाव परिसरात वृक्षारोपण, ‘एक पेड मॉं के नाम’ अभियान आणि नाला, तलाव, विहीर व पाझर तलावांच्या स्वच्छतेसारखे उपक्रम राबविण्याचे निर्देश आहेत. शेततळी, शेतबंधारे, CCT आणि Deep CCT यांची पाहणी करण्यावरही भर देण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कृषी, ग्रामविकास, महसूल व वन, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी योजना आणि शिक्षण विभागांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात विविध कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडवणे, भूजल पुनर्भरण करणे, मातीची धूप रोखणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या या अभियानातून जनसहभाग, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक डिजिटल माध्यमांची ताकद एकत्र आल्यास जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ या विचारातून जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. संकलन-अतुल पांडे सहायक संचालक (माहिती)