Friday, 8 May 2026

८ मे #दिनविशेष

 

आज #जगतिकरेडक्रॉसदिन.या संस्थेचे संस्थापक हेन्नी ड्युनान्ट यांच्या जन्मदिनाची आठवण म्हणून #रेडक्रॉस दिन साजरा होतो. १८ ऑगस्ट १८६३ रोजी हेन्नी यांनी रेडक्रॉस संस्थेचा पाया घातला.या संस्थेद्वारे जगभर करण्यात येणाऱ्या मानवतावादी कार्याचा सन्मान या दिवशी होतो.


मुक्तछंद काव्यप्रकाराचे प्रवर्तक आत्माराम रावजी देशपांडे तथा #कवीअनिल यांचा स्मृतीदिन.दशपदी हा १० चरणांचा काव्यप्रकार त्यांनी मराठी काव्य प्रांतात रुजवला.'फुलवात' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.१९५८च्या मालवण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

तीन वर्षाच्या बालकाला मिळाले जीवदान-मुख्यमंत्री सहायता निधीतून ३ लाख रुपयांची मदत


 

    नागपूर, ७ मे : रक्त कर्करोगग्रस्त एका तीन वर्षाच्या बालकाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक साह्य मिळाल्याने त्याच्यावर वेळीच उपचार होऊन जीवदान मिळाले आहे.
नागपूरच्या सावित्रीबाई फुले नगर, पार्वती नगरातील रहिवासी असलेल्या विवेक किरण देशमुख या तीन वर्षाच्या बालकाला रक्त कर्करोगाचे निदान झाले आणि त्याच्या माता- पित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या पालकांना मुलाच्या उपचाराचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न पडला होता. त्याला होणाऱ्या वेदनांनी त्यांचे हृदय पिळवटून निघत होते. मुलाचा जीव वाचविण्यासाठी तातडीने केमोथेरपी व इतर आवश्यक उपचार करणे गरजेचे होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बालकाबाबत कळताच त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहयता निधी अंतर्गत मुलाच्या उपचारासाठी ५० हजार रुपये व अतिरिक्त खर्च म्हणून २ लाख ५० हजार रुपये असे एकूण ३ लाख रुपये आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात आली. या मदतीमुळे व्होकहार्ट रुग्णालयात वेळीच केमोथेरपी आणि अन्य उपचार करण्यात आले. आता या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा उमललेले हास्य आमच्यासाठी जगण्याची नवीन उमेद घेऊन आल्याची भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कार्यालयाची कायर्पद्धती अत्यंत जलद, संवेदनशील व माणुसकी जपणारी असल्याचा अनुभव आम्हाला आल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. या मदतीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, नागपूर कक्ष प्रमुख डॉ. सागर पांडे यांचे आभार मानले आहेत.
00000

प्राण्यांवरही माणसांप्रमाणे प्रेम करा- ॲड. वैदेही पेंडसे


माहिती व जनसंपर्क विभागातर्फे व्याख्यान

    नागपूर,दि. ७ : मुक्या प्राण्यांनाही माणसांप्रमाणे भावना, संवेदना असतात. त्यामुळे आपण माणसांवर जसे प्रेम करतो, तसेच प्रेम प्राण्यांवरही केले पाहिजे, असे प्रतिपादन टेलिपथीद्वारे प्राण्यांशी संवाद साधणाऱ्या ॲड वैदेही पेंडसे यांनी आज येथे केले.
माहिती व जनसंपर्क विभागातर्फे मासिक उपक्रमांतर्गत आज श्रीमती पेंडसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 'टेलपथीद्वारे प्राण्यांशी संवाद' या विषयावरचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या ॲड. पेंडसे म्हणाल्या की, प्राण्यांशी कसा काय संवाद साधता येतो किंवा त्यांच्याशी कसे बोलता येते असे प्रश्न अनेकांना पडतात. सुरुवातीला मलाही ते पडायचे. मात्र हा अभ्यासक्रम केल्यानंतर मला त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या भावना कळू लागल्या आहेत. ही एक शास्त्रीय पद्धत आहे. प्रत्येक प्राण्याकडे एक सुपर नचरल पॉवर असते. त्यामुळे त्यांना सभोवतालच्या बऱ्याच गोष्टी आधीच कळू शकतात.
आपल्याला घरून बाहेर निघायचे असेल त्यावेळी घरातील कुत्रा पायाशी येऊन घुटमळायला लागतो. त्याला आपल्याल काय सांगायचे, हे मला या अभ्यासक्रमातून शिकता आले.प्राण्यांनाही त्यांचे दुःख मोकळे करायचे असते. आपल्या घरी येणारा नकारात्मक वृत्तीचा व्यक्ती किंवा भविष्यातील संकटाचे संकेतही कुत्रा किंवा मांजरीसारखे प्राणी त्यांच्या कृतीतून देत असतात. मांसाहारासाठी एखाद्या प्राण्याला कापले जाते त्यावेळी त्यांच्या मनातील भावना, त्यांच्या डोळ्यातील भीती आपल्याला कळू शकते. त्यामुळे प्राण्यांकडेही माणुसकीच्या नजरेने पाहण्याचा सल्ला पेंडसे यांनी दिला.
दिवाळीत कुत्र्यांच्या शेपटीला फटाके बांधणे, होळीला त्यांच्यावर रंग टाकणे हे क्रौर्य थांबविण्याचे आवाहन करून त्या म्हणाल्या की, टेलिपथी कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्यांची व्यथा समजून घेता येते. प्राणी माणसांना नेहमी क्षमा करतात, प्रेम करतात. त्यामुळे एखाद्या कुत्र्याला कितीही मारले तरी तो पुन्हा आपल्याजवळ येतो. घरात नेहमी वाद होत असतील तर त्यावरील उपाय किंवा करिअर निवडीबाबातही प्राणी संकेत देऊ शकतात, असा दावा पेंडसे यांनी केला. या पद्धतीने जगातील कुठल्याही प्राण्याशी कोणत्याही वेळी संवाद साधता येऊ शकतो आणि त्यांना समजून घेता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, असा संदेश आपल्या संतांनीही दिला असल्याचे समारोपात विभागीय संचालक डॉ. गणेश मुळे म्हणाले. भाषेशिवाय देखील संवाद होऊ शकतो. भाषेचा उगम झाला नव्हता त्याहीवेळी संवाद होतच होता. आपण जर प्राण्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते बोलतात, उत्तम प्रतिसाद देतात, असा आपला अनुभव असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. संचालन मुख्यमंत्री कार्यालयाचे माध्यम समन्वयक अविनाश महालक्ष्मे यांनी केले.
000000

Wednesday, 6 May 2026


 ७ मे #दिनविशेष 


भारतरत्न  #पांडुरंगवामनकाणे यांचा जन्मदिन. बाल वयात त्यांना अमरकोशाचे ४०० श्लोक मुखोद्गत होते.१९४२ मध्ये त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही मानाची पदवी मिळाली, तसेच अलाहाबाद,#पुणे विद्यापीठांच्या डी. लिट् या पदव्याही मिळाल्या.१९६३मध्ये त्यांचा #भारतरत्न ने गौरव झाला.