Monday, 7 December 2020

  राज्यअंतर्गत नागपूर जिल्हयामध्ये पीकस्पर्धांचे आयोजन                                                           

            नागपूर, दि 7 : कृषि खात्याकडून नागपूर जिल्ह्यात रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या  क स्पर्धाचे निकष बदलण्यात आले आहेतृणधान्यकडधान्यगळीतधान्य पिकांच्या जिल्हाअंतर्गत पक स्पर्धेचे आधीचे नियमवेळापत्रक आणि बक्षिस रक्कम देखील बदलण्यात आलेली आहेचाल रब्बी हंगामापासून नव्या निकषाची अंमलबजावणी होईलत्यासाठी 31 डिसेंबर, 2020 पर्यंत शेतकरी अर्ज करु शकतात .

ज्वारीगहूहरभराजवसतीळ अशा 5 पिकासाठी रब्बी पिकस्पर्धा होईलतालुका कृषी अधिकारी या स्पर्धाचे आयोजन करतीलयासाठी शेतकऱ्यांना किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड करावी लागेलक स्पर्धेतील पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे.

तालुका स्तरावर सर्वसाधारण गटासाठी 10 व आदीवासी गटात 5 कमीत कमी अर्ज येणे आवश्यक आहेसंबंधित गावात त्यासाठी पक कापणी समिती नेमली जाणार आहेज्या शेतकऱ्यांची पिकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा 1.5 पट किवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येऊन त्यांच्यामधून प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतीलत्यापेक्षा कमी उत्पादन असणारे शेतकरी सर्व पातळीवरील पीकस्पर्धा पुरस्करासाठी अपात्र समजण्यात येतील.

गावपातळीवर पीक कापणी समिती

         पीककापणी समितीत कोण असेल : पर्यवेक्षण अधिकारी (अध्यक्ष), कृषी सहाय्यक (सदस्य सचिव), लाभार्थी शेतकरीसरपंचउपसरपंचग्रामपंचायत सदस्यप्रगतशील शेतकरीपोलिस पाटीलतलाठीग्रामसेवक.

         राज्यस्तरावरील स्पर्धेचे निकाल कोण घोषित करेल : कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती.

          

                           तालुकाजिल्हा राज्य व विभागस्तरावरील बक्षिसांची रक्कम : बक्षिसे स्वरुप

 

.क्र.

स्पर्धा पातळी

सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये

पहिले

दुसरे

तिसरे

1

तालुका पातळी

5,000

3,000

2,000

2

जिल्हा पातळी

10,000

7,000

5,000

3

विभाग पातळी

25,000

20,000

15,000

4

राज्य पातळी

50,000

40,000

30,000

प्राथमिक माहिती

         अर्ज कुठे कराल : संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे

         स्पर्धेची माहिती कोण सांगेल : कृषी सहायककृषी पर्यवेक्षककृषी मंडळ अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी

         कोणती कागदपत्रे लागतात : 300 रुपये स्पर्धा प्रवेश शुल्क भरल्याचे चलन , सातबारा , आठ -  , आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र

अशा आहेत अटी

• पीक किमान सलग दहा आरक्षेत्रावर हवे

• स्पर्धेत कोणताही शेतकरी भाग घेऊ शकतो

• एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग शक्य

• स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रत्येक 300 रुपये

• पुरस्कारासाठी प्रथमद्वितीयतृतीय असे तीनच क्रमांक असतील

• तालुकाजिल्हाविभाग व राज्यस्तरावर पीकस्पर्धा होईल.

            जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पक स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment