मुंबई, दि. 1:सौभाग्य
योजनेतून वीज कनेक्शन नसलेल्या देशातील 4 कोटी कुटुंबाना
मोफत वीज कनेक्शन देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया
उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. 18 कोटी
महिलांना उज्ज्वल गॅस कनेक्शनचा निर्णय ग्रामीण व गरीब महिलांना दिलासा देणारा.
महिलाबचत गटांना 42 हजार कोटींवरून 55 हजार कोटी कर्ज देण्याचा निर्णय गरीब
महिलांना सक्षम व स्वत च्या पायावर उभे करणारा आहे असेही ते पुढे म्हणाले.
केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली
यांनी आज सादर केलेले अंदाजपत्रक शेती व ग्रामीण भारताच्या विकासासह ग्रामीण
अर्थव्यवस्था मजबूत करणारे असून बेरोजगार, ग्रामीण
भागातील महिला, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण सर्वच क्षेत्राच्या
विकासाला चालना देणारे हे अंदाजपत्रक असल्याची व या अंदाजपत्रकाचे स्वागत करीत
असल्याची प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली
आहे.
००००
No comments:
Post a Comment