Monday, 2 April 2018

राज्यभरात 13 लाख क्विंटलहून अधिक तूर खरेदी - सुभाष देशमुख


मुंबई, दि.2 :राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे.आजपर्यंत  १६७  तूरकेंद्रावर एक लाख १६ हजार २४५ शेतकऱ्यांची  १३ लाख ९९ हजार १५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
तूर खरेदीचा काळ तीन महिने असून आतापर्यंत ४ लाख ३ हजार ३७६ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही पणन मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment