Friday, 1 February 2019

सर्वसामान्य घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प - शिक्षणमंत्री विनोद तावडे

वृ.वि.365                                                                                 
                                                                                                 दि. 1 फेब्रुवारी2019

मुंबई, दि. 1 : केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना प्रत्येक नागरिकाला विकासाच्या प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. छोटे शेतकरीकामगार वर्गमध्यमवर्गीय नोकरदार करदातेआदी सर्व घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. तसेच आयकरातील सवलत अडीच लाखावरुन ५ लाखापर्यंत वाढविण्यात आल्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. असंघटित कामगारांसाठी ३ हजार रुपये पेन्शनशेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्यमत्स्यपालनासाठी स्वतंत्र आयोगपशुपालनासाठी किसान क्रेडिट कार्डगायींसाठी राष्ट्रीय कामधेनू योजनामहिलांना २६ आठवड्याची प्रसुती रजा,अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रक्कमेत ५० टक्के वाढ इत्यादी अर्थसंकल्पातील तरतूदींमुळे सर्वसामान्य घटकांना दिलासा मिळाला आहे.
००००

No comments:

Post a Comment