Tuesday, 12 December 2017

नागपूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेचा 69 हजार 309 शेतकऱ्यांना मिळणार लाभ



कर्जमाफीमुळे पिक कर्ज मिळणार शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
            नागपूर दि.12 :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिहयातील 69 हजार 309 शेतकरी खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्यातील ऐतिहासीक कर्जमाफी योजनेमुळे नविन पिक कर्ज घेणे आता सुलभ झाले आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे मोठा दिलासा मिळाला असून कर्जमाफी झाल्याचे संदेश मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
            काटोल येथील योगेश कृष्णाजी रेवतकर यांनी चार एकर शेती पिकविण्यासाठी 65 हजार रुपयाचे पिककर्ज घेतले होते. कर्ज थकीत झाल्यामुळे व्याजास ह 88 हजार रूपयाचे कर्ज या कर्जमाफी योजनेमुळे माफ झाले आहे. शासनाने अत्यंत पारदर्शकपणे कर्जमाफीची योजना राबविली असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज व्याजासह माफ झाले असल्याचा एसएमएस मिळाल्यामुळे मी आता कर्जमुक्त झालो आहे. त्यामुळे मला नविन कर्ज मिळणार आहे.
रेवराळ येथील इंदोरा सेवा सहकारी संस्था शाखेतून श्रीमती शंकुतला लेनीया यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. कर्ज थकीत झाल्यामुळे व्याजासह 1 लाख 40 हजार 766 रुपयाचे कर्ज माफ झाले असून कर्ज माफ झाल्याच्या संदेश एसएमएसवर मिळाला आहे. कर्जमुक्त झाल्यामुळे नव्याने कर्ज मिळण्यासाठी पात्र झाल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रूपयांची रक्कम बँकाकडे वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्हयातील ग्रीन यादी मधील 69 हजार 309 कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 44 हजार 270 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. तसेच 13 हजार 461 वन टाईम सेटलमेंटचा लाभ मिळणार आहे. तर 11 हजार 578 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे.  कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या खातेदारांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. जे शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र होते परंतु त्यांनी अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांना योजनेत सामावुन घेण्यात येणार असून शेवटच्या पात्र शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.
जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ग्रीन लिस्टप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी 277 कोटी 97 लाख 71 हजार रुपयाची रक्कम प्राप्त झाली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याला सुरुवात केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे 20 हजार 874 शेतकरी खातेदारांचा समावेश असून त्यांना 141 कोटी 93 लक्ष 277 हजार रुपयाची रक्कम प्राप्त झाली आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया निरंतर सुरु राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्यामुळे त्यांना नविन पिक कर्ज मिळण्यासाठी हे खातेदार शेतकरी पात्र झाले आहेत. कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेमुळे थकीत असलेले कर्ज व्याजासह माफ झाले असून आता नविन कर्ज घेऊन शेती अधिक किफायतशीर कशी होईल तसेच उत्पादन वाढीला नविन तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी नव्याने कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे.
कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला असता कळमेश्वर तालुक्यातील रिधी पिपळा येथील महिला शेतकरी यांनी पिक कर्जासाठी 25 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यांचे कर्ज व्याजासह माफ झाले आहे. तसेच कामठी तालुक्यातील दिघोरी, महालगाव येथील दोन एकर शेती असलेले सागर किशोरसिंग बैस यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 38 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. व्याजासह हे कर्ज 54 हजार 877 रुपयाचे झाले होते. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यामुळे व्याजासह माझे कर्ज माफ झाले आहे. निसर्गामुळे बरेचदा शेतीचे नुकसान झाल्यामुळे मजुरीचे काम करावे लागते. सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. मौदा तालुक्यातील आष्टी येथील पद्माकर श्यामजी ढोक यांचे 75 हजार 882 रुपयाचे कर्ज व्याजासह माफ झाले आहे. नागपूर तालुक्यातील लोढी पांजरी येथील उदयशंकर भगवतजी ठाकूर यांनी घेतलेल्या 1 लाख रुपये मुळ कर्ज व व्याजासह 1 लाख 44 हजार 251 रुपयाचे कर्ज माफ झाल्याचा एसएमएस संदेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
                                ** * * * **

No comments:

Post a Comment