Monday, 11 December 2017

नागपूरातील अडचणीतील सहकारी संस्था ठेवीदारांची बाजू सहकार मंत्र्यांनी ऐकली


            नागपूर, दि. 11 :  नागपूर जिल्हयात अडचणीत सापडलेल्या पतसंस्थांबाबत अधिकाऱ्यांनी वेळो-वेळी आढावा घेऊन ठेवीदारांचे अडकलेले पैसे मिळण्याच्या द्वष्टीकोणातून प्रयत्न करावेत असे निर्देश सहकारपणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज एका बैठकीत दिलेयावेळी ठेवीदारांच्या मागण्या त्यांनी ऐकून घेतल्या.    
            नागपूर  जिल्हयात अडचणीत सापडलेल्या दहा पतसंस्थाबाबत आज ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
            सहकार विभागाच्या वतीने थकबाकीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी कारवाई सुरु केली मात्र यात चार संस्थावर आयकर विभागाने जप्तीची कारवाई केली त्यामुळे मालमत्ता आयकर विभागाच्या ताब्यात गेलेल्या असल्याने वसूली शक्य झालेली नाही, अशी माहिती जिल्हा निबंधक शिवाजी भोसले यांनी यावेळी दिली.
            जिल्हयातील नागमित्र नागरी सहकारी संस्थाशुभम अर्बनकळमना मार्केट अर्बनदी एव्हरेस्ट अर्बनयुवाचैतन्य अर्बनभवानी माता अर्बनलोकजीवन अर्बनशारदा अर्बन आणि छत्रपती अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी या दहा संस्थाच्या संदर्भात ही बैठक होती.
            या पतसंस्थाची केस 2006 पासून आजपर्यंत प्रलंबित आहेती गतिमान पध्दतीने सोडवा अशी विनंती ठेवीदारांच्या वतीने सुधाकर शंकरराव जोशी यांनी सहकार मंत्र्याकडे केली.
            आयकर खात्याने केलेल्या कारवाईत 25 कोटी एकूण मालमत्ता व  रक्कम असलेल्या संस्थेला 100 कोटी कर लावला असा मुद्दा चर्चेस आलाया विरोधात सहकार विभागातर्फे निबंधकांनी दाद मागावी अशी आग्रही मागणी ठेवीदारांनी यावेळी केली.
            ठेवीदारांतर्फे आपले म्हणणे मांडण्यासाठीराजाराम इंगोलेशरदचंद्रभुरेविजय शेंडेरामदास मेहरकुळे आणि श्रीकांत गोपाळ पिंपळकर आदीनी बैठकीस उपस्थिती नोंदवलीया दहा संस्थाचे प्रशासक आणि सहकार विभागाचे अधिकारी या बैठकीस उप‍‍‍स्थित होते.
0000

No comments:

Post a Comment