नागपूर, दि. 11 : नागपूर जिल्हयात अडचणीत सापडलेल्या पतसंस्थांबाबत अधिकाऱ्यांनी वेळो-वेळी आढावा घेऊन ठेवीदारांचे अडकलेले पैसे मिळण्याच्या द्वष्टीकोणातून प्रयत्न करावेत असे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज एका बैठकीत दिले. यावेळी ठेवीदारांच्या मागण्या त्यांनी ऐकून घेतल्या.
नागपूर जिल्हयात अडचणीत सापडलेल्या दहा पतसंस्थाबाबत आज ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सहकार विभागाच्या वतीने थकबाकीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी कारवाई सुरु केली मात्र यात चार संस्थावर आयकर विभागाने जप्तीची कारवाई केली त्यामुळे मालमत्ता आयकर विभागाच्या ताब्यात गेलेल्या असल्याने वसूली शक्य झालेली नाही, अशी माहिती जिल्हा निबंधक शिवाजी भोसले यांनी यावेळी दिली.
जिल्हयातील नागमित्र नागरी सहकारी संस्था, शुभम अर्बन, कळमना मार्केट अर्बन, दी एव्हरेस्ट अर्बन, युवाचैतन्य अर्बन, भवानी माता अर्बन, लोकजीवन अर्बन, शारदा अर्बन आणि छत्रपती अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी या दहा संस्थाच्या संदर्भात ही बैठक होती.
या पतसंस्थाची केस 2006 पासून आजपर्यंत प्रलंबित आहे. ती गतिमान पध्दतीने सोडवा अशी विनंती ठेवीदारांच्या वतीने सुधाकर शंकरराव जोशी यांनी सहकार मंत्र्याकडे केली.
आयकर खात्याने केलेल्या कारवाईत 25 कोटी एकूण मालमत्ता व रक्कम असलेल्या संस्थेला 100 कोटी कर लावला असा मुद्दा चर्चेस आला. या विरोधात सहकार विभागातर्फे निबंधकांनी दाद मागावी अशी आग्रही मागणी ठेवीदारांनी यावेळी केली.
ठेवीदारांतर्फे आपले म्हणणे मांडण्यासाठी, राजाराम इंगोले, शरदचंद्र, भुरे, विजय शेंडे, रामदास मेहरकुळे आणि श्रीकांत गोपाळ पिंपळकर आदीनी बैठकीस उपस्थिती नोंदवली. या दहा संस्थाचे प्रशासक आणि सहकार विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment