Sunday, 10 December 2017

दोन वर्षांत सिंचन प्रकल्पांसाठी साडेतेरा हजार कोटी - मुख्यमंत्री


*  बळीराजा जल संजीवनी योजना राबविणार
*  सिंचन 40 टक्क्यांवर नेणार
*  केंद्र शासनाचे सहकार्य लाभणार
नागपूर, दि. 10 : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सिंचन हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने 13 हजार 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यामुळे अपूर्ण प्रकल्प वेगाने पूर्ण होऊन सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रामगिरी येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांची सिंचनाच्या संदर्भात एकत्रित आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला केंद्रीय रस्ते, भूपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आयएसचहल आदी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री श्रीफडणवीस म्हणालेदोन वर्षात प्रत्येकी पाच हजार कोटीअनुशेषाचे एक हजार कोटीकेंद्र शासनाच्या विशेष प्रकल्पांना सहाय्यापोटी अडीच हजार कोटी असे साडेतेरा हजारकोटींचा निधी येत्या दोन वर्षात उपलब्ध होया निधीतून तातडीने पूर्ण होणारे प्रकल्प पूर्ण करून सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईलकेंद्र आणि राज्य शासनाकडून हा निधी मिळणारच असल्यामुळेसिंचन विभागाने दिलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण करावायामुळे प्रकल्पांच्या किंमती वाढणार नाहीसिंचन प्रकल्पांची किंमत वाढल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईलसिंचनाचा हा प्रकल्पमुदतीत पूर्ण करण्यासाठी बळीराजा संजीवनी योजना राबविण्यात येणार आहे.
            सिंचन प्रकल्प पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयकांचा मोठा प्रश्न गेल्या काळात निर्माण झाला होतायावर उपाय म्हणून देयके पारीत करण्याची पद्धत ऑनलाईन करावीतसेच पैसाकंत्राटदाराच्या खात्यात थेट जमा करावायामुळे वेळेची बचत होऊन पारदर्शकताही येईलतसेच काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटाची 75 टक्के रक्कम तातडीने देण्यात यावीउर्वरीत रक्कम कामाचीखातरजमा झाल्यानंतर देण्यात यावीप्रकल्पातील पाणी सिंचनासाठी पोहोचविण्याच्या कामी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावायासाठी आयआयटीमधील तज्ज्ञांची मदत घ्यावीयामुळे प्रकल्पांचीकिंमत कमी होण्यास मदत होईलत्यासोबतच सूक्ष्म सिंचनाचा उपयोग केल्यास उपलब्ध पाण्याचा महत्तम उपयोग होण्यास मदत होणार असल्याचे श्रीफडणवीस यांनी सांगितले.
राज्याचे सिंचन 40 टक्क्यांवर नेणार – नितीन गडकरी
            सिंचनाची व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीशेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्यातील सिंचन 40 टक्क्यांवर नेण्यात येणार आहेअशी माहितीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
            श्रीगडकरी म्हणालेराज्यातील सिंचन ही प्रथम प्राधान्याचा विषय आहेत्यामुळे सिंचनाची कामे विहित मुदतीत करण्यात येतीलसिंचन प्रकल्पांना येणाऱ्या अडचणी प्रशासकीय पातळीवरतातडीने पूर्ण करण्यात येतीलसिंचनाचे प्रकल्प होत असताना पाण्याचे वितरणप्रकल्पांसाठी जमिनीचे अधिग्रहण आदी बाबींवरही लक्ष देणे गरजेचे आहेसिंचन प्रकल्पांची स्थिती माहिती होण्यासाठीसंगणकीकृत यंत्रणा तयार करावीयामुळे सर्व प्रकल्पांवर लक्ष देणे सोपे होईल.                                             00000

No comments:

Post a Comment