सरपंचपदांच्या 69 रिक्त जागांसाठीही मतदान
मुंबई, दि. 23 (रा.नि.आ.): राज्यातील विविध 26 जिल्ह्यांमधील 1 हजार 41
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 69 ग्रामपंचायतींच्या
सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 26 सप्टेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी
संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी
सांगितले की, ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या
कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी
हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश
आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 11 सप्टेंबर 2018 या कालावधीत स्वीकारले
जातील. त्यांची छाननी 12 सप्टेंबर 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबर 2018 पर्यंत मागे घेता येतील व
त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 26 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी
5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30
पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 27 सप्टेंबर 2018 रोजी
होईल.
सार्वत्रिक निवडणूक
होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 6, रायगड- 121, रत्नागिरी- 19, सिंधुदुर्ग-
4, नाशिक- 24, धुळे- 83, जळगाव- 6, अहमदगनर- 70, नंदुरबार-
66, पुणे- 59, सोलापूर- 61, सातारा- 49, सांगली- 3, कोल्हापूर-
18, बीड- 2, नांदेड- 13, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला-
3, यवतमाळ- 3, बुलडाणा- 3, नागपूर- 381, वर्धा- 15, चंद्रपूर-
15, भंडारा- 5 आणि गडचिरोली- 5. एकूण- 1041.
पोटनिवडणूक होणाऱ्या
सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 4, रायगड-
3, सिंधुदुर्ग- 1, नाशिक- 8, धुळे- 2, जळगाव- 1, पुणे- 6,
सातारा- 3, सांगली- 10, उस्मानाबाद-
1, जालना- 2, यवतमाळ- 3, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर-
1, चंद्रपूर- 2 आणि गडचिरोली- 14. एकूण- 69
०-०-०
No comments:
Post a Comment