Sunday, 26 August 2018

पूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध रहावे

 मुंबईदि. २६ : पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढेलअसा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे या दरम्यान गडचिरोलीचंद्रपूरयवतमाळगोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे. या दरम्यान नागपूरवर्धाअमरावतीनांदेडहिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भमराठवाडा आणि खानदेशात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे.
राज्यातल्या इतर भागातील हवामानात विशेष बदल होणार नाही. 28 ऑगस्ट नंतर पुढचे काही दिवस राज्यात पुन्हा पाऊस कमी होणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
0000

No comments:

Post a Comment