मुंबई, दि.4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
निर्मित 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांची 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांचे विचार व कार्य' या विषयावर विशेष मुलाखत
घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 5
डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका
पल्लवी मुजूमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या ६ डिसेंबर या
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून. भारतीय संविधानाचे शिल्पकार, एक थोर समाजसुधारक, आर्थिक धोरणाचे
धुरीण, एक व्यासंगी पत्रकार, कामगारांच्या
न्याय अधिकाराचे लढवय्ये, शेतक-यांच्या प्रश्नासाठी जागरूक
ज्ञानपुरूष व समताप्रेमी, निस्सीम ग्रंथप्रेमी असे भारतरत्न
डॉ.बाबासाहेंब आंबेडकर यांच्या प्रत्येक क्षेत्रातील कार्याची सविस्तर माहिती ज्येष्ठ साहित्यिक पतंगे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment