4,771 रिक्तपदांसाठीही मतदान
मुंबई, दि. 23:
राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील
सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य
निवडणूक आयोगाने केली आहे.
आयोगाच्या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश
आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले
जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी
होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018
पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते
सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून
दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे-
7, जळगाव- 8, अहमदगनर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा-
23, सांगली- 82, कोल्हापूर- 74,
औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड-
7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29,
वर्धा- 14, भंडारा- 4
आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.
पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची
संख्या): ठाणे (90)- 167, पालघर
(73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी
(202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक
(200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)-
96, नंदुरबार (32)- 36, अहमदगनर (78)-
124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)-
154, सातारा (409)- 777, सांगली (40)-
81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)-
41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43 आणि गडचिरोली (175)- 464.
एकूण (2,812)- 4,771.
०-०-०

No comments:
Post a Comment