Friday, 6 December 2019

कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु


मुंबईदि. 6, राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सद्या कांदाबटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी - विक्रीची गैरसोय होवू नये यासाठी बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही  सुरू ठेवण्यात येणार आहेत.
 बाजारपेठेत शेतमालाची घटलेली आवक पाहता कांद्याच्या दरात दिवसेदिवस वाढ होत आहे.  अशा परिस्थितीत सुटट्यांमुळे बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहिल्यास ग्राहक आणि शेतकरी यांची गैरसोय होवू शकते म्हणून शेतकऱ्यांना कांदाबटाटाटोमॅटो सुट्टीच्या दिवशीही बाजार समितामध्ये घेवून येता यावे यासाठी सुट्टीदिवशीही बाजारसमित्यांचे व्यवहार सुरू राहाणार आहेत. 
ज्या जिल्ह्यामंध्ये कांदाबटाटा आणि टोमंटो या शेतमालाचे उत्पादन आणि आवक जास्त आहे अशा जिल्हयातील सर्व बाजार समित्यांनी आणि विशेषतः नाशिकअहमदनगरसोलापूरपुणेकोल्हापूरसाताराठाणे व मुंबई या जिल्ह्यातील बाजार समित्यांनी शासकीयसार्वजनिक आणि बाजार समित्यांच्या साप्ताहीक सुटट्यांच्या दिवशीही बाजार आवारे चालू ठेवावीत आणि शेतमाल उत्पादक शेतकरी/ व्यापारी आणि ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे पणन संचालनालयांच्या वतीने परिपत्रकाद्वारे बाजार समित्यांना कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment