राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर
होत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीतील बदल लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागातील
अधिनस्त अध्यापकांच्या व प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी कायद्यान्वये अध्यापक
विकास संस्था स्थापन करण्याच्या इतिवृत्तास काही सुधारणांसह आज झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत घेण्यात आला.
या संस्थेस स्वायत्तता मिळण्याच्या
अनुषंगाने कंपनी कायद्याखाली ही संस्था स्थापन करण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग 40 टक्के, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा
हिस्सा 5 टक्के, राज्यातील सर्व विद्यापीठांचा हिस्सा
40 टक्के, शैक्षणिक संस्था व उद्योग यांचा हिस्सा
5 टक्के तसेच स्वयंसेवी संस्था व व्यवसाय संस्था यांचा हिस्सा
10 टक्के एवढा राहील.
विद्यापीठे तसेच महाविद्यालये, संस्था यांच्याकडून सदस्यत्व शुल्क घेण्यात येणार असून कार्पोरेट व बिझनेस हाऊस
यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा कॉर्पस फंड तयार करण्यात येईल. या प्रशिक्षण संस्थेचे
कामकाज चालविण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल व मुख्य सचिव हे त्याचे
अध्यक्ष असतील.
सदर संस्थेची
उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः-
• उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील
शिक्षकांना उद्योग/व्यवसाय व त्यांच्या संबंधीत क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान, शैक्षणिक पद्धती/तंत्रज्ञान यांनी समृद्ध करणे.
• विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक
गुणवत्तेमध्ये झालेल्या बदलांच्या आधारे प्रशिक्षणाची परिणामकारकता तपासून प्रशिक्षण
पद्धतीमध्ये गरजेनुरुप बदल करणे.
• उद्योग क्षेत्रांमध्ये उपलब्ध
असलेल्या/होणाऱ्या रोजगार संधीच्या आधारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विकसित करून तसे
बदल अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणे.
• शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी
प्रभावी शिकणे-शिकविण्याची पध्दती स्थापित करणे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधनास
प्रोत्साहित करणे.
• शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांमधील
व इतर राज्यांतील शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करुन अद्ययावत तंत्रज्ञानाधिष्ठित व रोजगाराभिमुख
अभ्यास पद्धतींबाबत शासनास शिफारस करणे/सल्ला देणे.
• पायाभूत/उजळणी/अभिमूख/निय़तकालिक
प्रशिक्षण आयोजित करणे.
संस्थेमध्ये अभ्यासक्रम आणि
अध्यापनशास्त्र,
अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेतृत्व
विकास,
बहू-अनुशासनात्मक अध्यापक समूह व सर्वसमावेशक शिक्षण अशी 5 उत्कृष्टता केंद्रे प्रस्तावित असून याद्वारे सर्वसमावेशक असे
प्रशिक्षण देणे त्याचप्रमाणे दुर्बल घटक, महिला व दिव्यांग यांच्या शिक्षणाच्या
अनुषंगाने संवेदशिलता निर्माण करण्याचाही उद्देश आहे.
-----0-----
अत्यंत आवश्यक असलेला चांगला निर्णय
ReplyDelete