मुंबई, दि. 1 : राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण समर्पणभाव, श्रद्धा व त्याग या शाश्वत मूल्यांचे स्मरण देतो. बकरी ईदचा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, प्रगती व समृद्धी घेऊन येवो, अशी शुभ कामना मी या प्रसंगी करतो व राज्यातील जनतेला, विशेषतः मुस्लीम बंधू - भगिनींना बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
००००
No comments:
Post a Comment