नागपूर, दि.22 : येत्या जानेवारी महिन्यात केंद्र सरकार शुद्ध पाण्याच्या बाबतीत धोरण जाहिर करणार असल्याने राज्यातील सर्व नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य श्री. प्रकाश गजभिये यांनी नागपूर शहरात मिनरल वॉटरच्या नावाखाली पाण्याची विक्री होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. श्री.बापट पुढे म्हणाले नागपूर जिल्ह्यात बंद बॉटलमध्ये पाणी पुरवठा करणारे 82 उत्पादक आहेत. ज्या कंपन्यांनी दूषित पाण्याचा पूरवठा केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंद्र सरकारचे पाणी पुरवठ्याबाबत नव्याने धोरण येत असल्याने भविष्यात सर्वच नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल.
0000
No comments:
Post a Comment