मुंबई,
दि.5 :माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास’
कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांची 'भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य' या
विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही
मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून बुधवार दि. 6 आणि गुरुवार दि. 7
डिसेंबर 2017 रोजी सकाळी
7.25 ते 7.40
या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका पल्लवी मुजूमदार यांनी घेतली
आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6
डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचे शिल्पकार,
एक थोर समाजसुधारक, आर्थिक
धोरणाचे धुरीण, एक व्यासंगी पत्रकार,
कामगारांच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये, शेतक-यांच्या
प्रश्नासाठी जागरूक ज्ञानपुरूष व समताप्रेमी, निस्सीम
ग्रंथप्रेमी असे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक क्षेत्रातील
कार्याची सविस्तर माहिती ज्येष्ठ साहित्यिक पतंगे यांनी ‘दिलखुलास’
या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment