सकाळ समूह'लीडरशिप
कॉनलेव्ह 2017'
मुंबई, दि. 5 :
समाजातील गरिबी, अशिक्षितता, अंधश्रद्धा, जातीयता आदी
उणिवा दूर करण्यास तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी,युवा पिढीने
प्रेरणा घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे आपले सामाजिक
नेतृत्त्व घडवावे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.सकाळ
समूहाच्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात 'यिन'च्या 'लीडरशिप
कॉनलेव्ह 2017' या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे
मुख्यमंत्री श्री. फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी
व्यासपीठावर सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार उपस्थित होते.
पुढे
बोलतानामुख्यमंत्री म्हणाले,अभिजित पवार यांनी युवकांकरिता एक अतिशय चांगले
व्यासपीठ ‘यिन’ च्या माध्यमातून उभे केले आहे.माध्यमाच्या पलीकडची बांधिलकी जपत
नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. महिला, युवक, शेतकरी
यांच्यात सामाजिक नेतृत्त्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. माध्यमातील क्षमतेचा
समाजबांधणीसाठी, नेतृत्वबांधणीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी उपयोग केला.
सध्या समाजात सर्वच क्षेत्रात
नेतृत्वाची कमतरता आहे. आपल्याकडे आज केवळ राजकीय आणि व्यावसायिक नेतृत्व असल्याचे
दिसून येते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला आदी
सर्व क्षेत्रात नेतृत्वनिर्मितीची गरज असून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जो
निवडून येतो तो नेता नव्हे तर जो लोकांना प्रेरणा देतो तो नेता होय. आपण जेव्हालोकांना
आपल्या व्यक्तित्वातून आणि कृतीतून सकारात्मक बदलांसाठी प्रेरणा देतो तेव्हा आपली वाटचालनेतृत्वाकडे
होते. त्यातून समाजाची प्रगती करण्याची आपल्याला संधी मिळते.प्रेरणा देणारा केवळ
शब्दांनी प्रेरणा देण्याऐवजी कृतीतून देतो तेव्हा खरा परिणाम होतो,असेही श्री.
फडणवीसयावेळी म्हणाले.
आपल्या
राज्याला एनसीसीचा असलेला कोटा 2 लाखांनी वाढवून मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे
विनंती केली आहे. दिल्ली येथील निर्भया प्रकरणामुळे बलात्काराच्या व्याख्येमध्ये
व्यापक सुधारणा केल्या. त्यामुळे महिलांवरील अन्याय, अत्याचाराचे
गुन्हे करणाऱ्यांमध्ये एक प्रकारची जरब बसली आहे. तरीही असे गुन्हे घडत असले तरी
त्यामध्ये 92 टक्के गुन्हे हे ओळखीच्या व्यक्तीकडून होतात. त्यातही 80 टक्के
बलात्काराचे, अत्याचाराचे गुन्हे हे जवळच्या नातेवाईकाकडून होतात असे राष्ट्रीय
गुन्हे संशोधन संस्थेच्या (एनसीआरबी) अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे
समाजाचीच मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यादृष्टीने शालेय स्तरापासूनच मुलींकडे
पाहण्याची दृष्टी आदरभावाची निर्माण करावी यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न करण्यात
येतील,
असेही
ते म्हणाले.
आपल्या
देशात जगातील कोणत्याही देशापेक्षा 25 वर्षे वयातील युवांची मोठी संख्या आहे.
त्यामुळे भारतासाठी प्रचंड मोठी संधी आहे. यापुढे 15 ते 20 वर्षात आपण जगाचे
नेतृत्व करू शकतो. केवळ आपल्याच देशाला नव्हे तर विकसित राष्ट्रांनाही कुशल युवा
मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. त्याचा
प्रभावी वापर केल्यास आपण खूप बदल घडवू शकतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यिन
सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाउत्तरे दिली.
अभिजित पवार म्हणाले, आपल्या
प्रत्येकामध्ये नेतृत्वाची क्षमता असते. या क्षमतेला समोर आणण्यासाठी प्रयत्न
करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस हे अत्यंत उर्जाशील व्यक्तीमत्त्व असून
त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. त्यांच्या नेतृत्वातील गुणात्मकता, नीतिमूल्ये, कष्टाळूपणा
सर्वांनाच प्रभावीत करतात. यिनच्या माध्यमातून राज्यातील युवकांमध्ये विविध
क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सकाळच्या लीडरशीप
डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यक्षपद स्वीकारण्यास प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.
रघुनाथ माशेलकर यांनी मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात
उत्कृष्ट यिन सदस्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास साम
वाहिनीचे संपादक संजय आवटे, डिलीव्हरींग चेंज फाऊंडेशनचे
पदाधिकारी, राज्यभरातून आलेले यिन मिनिष्ट्रीचे युवक-युवती उपस्थित होते.
००००



No comments:
Post a Comment