पत्रकार आरोग्य शिबीराला मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई, दि.27 : पत्रकार हे क्षेत्रियस्तरावर
अत्यंत मेहनतीचे काम करतात. त्यांना वेळे काळाचं बंधन नसते, प्रसंगी चार-पाच तास थांबावे लागले तरी ते बातमी मिळवितात.
त्यांच्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या घराच्या प्रश्नबाबतही शासन सकारात्मक
असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
आझाद मैदान येथे टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि वैद्यकीय शिक्षण
विभागाच्यावतीने आयोजित पत्रकार आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री
श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पत्रकारांना 24 तास काम करावे लागते, यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ताण तणाव वाढतो. पत्रकारांना सुदृढ
आरोग्य लाभण्यासाठी या आरोग्य शिबीराचेआयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांच्या आरोग्याच्या
दृष्टीने हे शिबीर फायदेशीर आहे, याचा लाभ सर्व
पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहन
त्यांनी यावेळी केले. तसेच सर्व पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभो, अशा शुभेच्छाही दिल्या.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, आमदार राज पुरोहित, डॉ. तात्याराव
लहाने, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे
अध्यक्ष विमल सिंग, उपाध्यक्ष अतुल
कदम, महासचिव विलास आठवले यांच्यासह
विविध दूरचित्रवाहिन्यांचे पत्रकार उपस्थित होते.
या शिबिरात सर्व माध्यमातील पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून औषधोपचार
करण्यात येणार आहेत.
००००
No comments:
Post a Comment