मुंबई, दि. 27
:माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी आर. विमला यांची मुलाखत गुरुवार दि. 28 जून
आणि शुक्रवार दि.29 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात येईल. निवेदिका
पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली
आहे.
महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात, त्यामागचा
उद्देश व संकल्पना, अभियानाची वैशिष्ट्ये, महिलांचे
सक्षमीकरण,
या अभियानाचा फायदा मिळवून घेण्यासाठीचे निकष, महिला व तरूणांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, या
अभियानाबद्दल करण्यात आलेली जनजागृती तसेच ‘ऑन अ
बॅच’
ही संकल्पना या विषयांची माहिती श्रीमती आर. विमला यांनी
दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment