(दि. २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी
जयंतीविशेष)
मुंबई, दि.१ : माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात
महात्मा गांधीजींचे अभ्यासक अशोक चौसाळकर आणि लेखक तथा अभ्यासक अरुण खोरे
यांची "महात्मा गांधीजींचे विचार व कार्य" या विषयावर मुलाखत घेण्यात
आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या
वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राष्ट्रपिता महात्मा
गांधीजी यांचे १५० वी जयंती वर्ष साजरे केले जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी
यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा जगभरात 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, गांधीजींच्या जीवनातील
अजरामर तत्वे,
त्यांचे
कार्य,
मूल्ये
आणि साहित्य तसेच गांधीजींचे विचार आणि तत्वांचा वारसा पुढे नेण्यासाठीचे प्रयत्न
याबाबत माहिती श्री. चौसाळकर आणि श्री. खोरे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली
आहे.
00000
No comments:
Post a Comment