Tuesday, 9 April 2019

तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात 249 उमेदवार निवडणूक लढविणार

मुंबईदि. 9 : राज्यतील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील चौदा मतदार संघामध्ये एकूण 249 उमेदवार निवडणूक लढविणार आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख दि. 8 एप्रिल ही होती. अंतिम यादीत 249 उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. अंतिम यादीतील उमेदवारांची मतदारसंघ निहाय संख्या पुढील प्रमाणे जळगाव (14), रावेर (12), जालना (20), औरंगाबाद (23), रायगड (16),पुणे (31), बारामती (18), अहमदनगर (19), माढा (31), सांगली (12), सातारा (9), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15), हातकणंगले (17).
तिसऱ्या टप्प्यात दि. 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहेअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
००००

No comments:

Post a Comment