Monday, 30 September 2024
‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये नागपूर विभागातील ७ ग्राम पंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार
विभागीय आयुक्त बिदरी यांच्या मार्गदर्शनात अभिनव यश
नागपूर, दि. ३० : माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यस्तरावर प्रथमच नागपूर विभागातील ग्रामपंचायतींनी कामाची मोहर उमटविली आहे. या अभियानांतर्गत विभागातील सात ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय पुरस्करासाठी निवड करण्यात आली असून १५ ग्रामपंचायतींना विभागीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव यश प्राप्त झाले आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निर्सगाशी संबंधीत पंच तत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील एकूण ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायतींमध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निसर्गाचे पंचमहाभूत भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश यामध्ये कामे केली व सर्व कामांचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल २७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध लोकसंख्या गटानुसार जाहीर करण्यात आला. या निकालात नागपूर विभागातील एकूण ७ ग्राम पंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार व १५ ग्राम पंचायतींना विभागीय पुरस्कार प्राप्त झाले.
या ७ ग्रामपंचायतींची राज्यस्तरावर उत्तम कामगिरी
या अभियानामध्ये विविध मानकांमध्ये सरस कामगिरी करत विभागातील ७ ग्रामपंचातींनी राज्यस्तरावर कामाची छाप सोडली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्याच्या बेला ग्राम पंचायतीला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे १.२५ कोटींचे बक्षिस जाहीर झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्याच्या डव्वा ग्रामपंचातींने तिसऱ्या क्रमांक पटकवला असून ५० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे. या जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या भजेपार ग्राम पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्तेजनार्थ,चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या चीचबोडी ग्राम पंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्त्तेजनार्थ, वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या मिर्झापूर ग्राम पंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्त्तेजनार्थ, याच जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींना उंच उडी (कामाचा प्रगती आलेखात) श्रेणीत प्रत्येकी ५० लाखांचे बक्षिस जाहीर झाले आहेत. यात सेलू तालुक्याच्या हिंगणी ग्राम पंचायतीचा आणि कारंजा तालुक्याच्या ठाणेगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
विभागीय स्तरावर या १५ ग्रामपंचायती ठरल्या अव्वल
'माझी वसुंधरा अभियान ४.०' मध्ये विभाग स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या १५ ग्रामपंचायतींची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी (ता.भद्रावती), नंदा (ता.कोरपना), आनंदवन (ता.वरोरा), भेंडवी (ता.राजुरा), पेटगाव (ता.सिंदेवाही) आणि कुकुडसात (ता.कोरपना) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव (ता.देवळी), आंजी(मोठी) (ता.वर्धा), हिंगणी (ता.सेलु), ठाणेगाव (ता.कारंजा), राजनी (ता.कारंजा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील खरबी (ता.भंडारा) ग्रामपंचायतीसह नागपूर जिल्ह्यातील गोधनी (ता.नागपूर), नेरी मानकर (ता.हिंगणा), खुर्सापार(ता.काटोल) ग्राम पंचायतींना बक्षिस जाहीर झाले आहेत. विभागातील सर्वोत्तम जिल्हा परिषदांमध्ये गोंदिया जिल्हा परिषदेला बक्षिस जाहीर झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे व जिल्हा परिषदेचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. विपीन इटनकर त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तालयातील विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विभागीय समन्वयक संकेत तालेवार व ईशा बहादे यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे व जिल्हा परिषदेचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
00000
Sunday, 29 September 2024
विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप
नागपूर, दि. 29 - राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. एकीकडे आपण विकासाची गती कायम राखली असून दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. विकास कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
खामला येथील शांतीनिकेतन कॉलनी मैदान आणि हावरापेठ येथे बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप यावेळी करण्यात आले. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, स्थानिक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आहेत. एकीकडे लाडकी बहीण सारखी योजना आपण सुरू केली आहे. तर दुसरीकडे लेक लाडकी सारखी योजना सुरू केली. यामाध्यमातून अठराव्या वर्षापर्यंत मुलीला टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये मिळणार आहेत.
बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ही योजना केवळ कीट वाटप किंवा पाच हजार रुपये एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण, उपचार, विमा, घर बांधकामासाठी अनुदान या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. भविष्यात सर्व योजना बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदणी कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
समाजातल्या मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबीयांपर्यंत आपल्याला मुलभूत सोईसुविधा आणि सेवा कशा पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे करीत असताना सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण वैष्णवी बावस्कर यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
0000000
शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना जो शब्द दिला होता त्याची पूर्तता करता आली याचे खरे समाधान -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे आवंटनपत्र बहाल
नागपूर,दि. 29: देशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून जे वैभव मिहानच्या माध्यमातून नागपूरला मिळत आहे, त्या वैभवाचा पाया हा शिवणगाव येथील अनेक कुटुंबांच्या योगदानातून साकारलेला आहे. शिवणगाव मधील प्रकल्पग्रस्त रहिवासीयांना न्याय भेटला पाहिजे, ज्यांच्या जमीनी गेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला भेटला पाहिजे, यासाठी आम्ही सुरुवातीच्या काळापासून आग्रही होतो. विरोधी पक्ष नेता असतांना यासाठी पुन्हा आपण लढा दिला. तेव्हा रहिवासीयांना फार कमी जागा या दर्शविल्या गेल्या होत्या. रेडीरेकनरचे दर कमी करुन तत्कालीन शासनाने अन्याय केला. मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर स्थानिकांच्या या अन्यायाला दूर करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले. शिवणगाव वासियांना जो शब्द दिला होता त्याची पुर्तता करता आली याचे आज समाधान आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवणगाव येथील समाज भवनात आयोजित भूखंड वितरण समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, स्थानिक पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थितीत होती.
कोणत्याही प्रकल्पासाठी जागा घेतांना रेडीरेकनरचे दर कमी करुन जागा घेणे हे कोणत्याच कायद्यात बसणारे नव्हते. यासाठी आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागला. या लढयात आपल्याला यश मिळाले. त्यामुळेच शिवणगाव मधील अनेकांना त्यांच्या जमीनीचा कोट्यावधी रुपयांच्या घरात मोबदला मिळाला. अनेकांना आजच्या घडीला कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असेलेले प्लाट मिळाले, याचा मला मनस्वी आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांनी यासाठी महसूल विभागाशी संबंधित कामे लवकर पूर्ण केल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले.
न्यायाच्या प्रतीक्षेत शिवणगावातील लोकांनी अत्यंत संयमी व जबाबदार नागरिकत्वाचा प्रत्यय दिला आहे. केवळ विदर्भच नव्हे तर भारताच्या गौरवात भर पाडणारे, विदर्भातील व्यवसायाला, उद्योग जगताला, कृषी क्षेत्राला गती देणाऱ्या विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिल्याने आता मार्ग मोकळा झाला आहे. आता या प्रकल्पातुन अनेक क्षेत्रात नवनवीन रोजगाराच्या संधी वाढणार असून स्थानिकांना चांगली संधी मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश भोयर यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवणगाव येथील बबनराव महाले, सागर, संजय, अजय, सुरेश, गजानन महाले, प्रविण वरणकर, संदीप वरणकर , शेषराव शहाणे, दशरथ शहाणे, रामचंद्र शहाणे, राजेंद्र नितनवरे, कविता भोंगाडे, पाडुरंग देशमुख, सरस्वताबाई ठाकरे, निर्मलाबाई ठाकरे, अशोक ठाकरे, सुनिल ठाकरे, रंगराव ठाकरे, शकुंतला, अतुल, अमोल ठाकरे, सुनिल झलके, सविता झलके, अशोक नेवारे, देवराव डेंगे, रमेश डेंगे, सुधाभाई डेंगे आदींना प्रातिनिधीक स्वरुपात भूखंडाचे आवंटनपत्र बहाल करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे कामगारांना कीट वाटप करण्यात आले. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0000000
विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप
नागपूर, दि. २९ - राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. एकीकडे आपण विकासाची गती कायम राखली असून दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. विकास कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
खामला येथील शांतीनिकेतन कॉलनी मैदान आणि हावरापेठ येथे बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप यावेळी करण्यात आले. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, स्थानिक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आहेत. एकीकडे लाडकी बहीण सारखी योजना आपण सुरू केली आहे. तर दुसरकीडे लेक लाडकी सारखी योजना सुरू केली. यामाध्यमातून अठराव्या वर्षापर्यंत मुलीला टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये मिळणार आहेत.
बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ही योजना केवळ कीट वाटप किंवा पाच हजार रुपये एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण, उपचार, विमा, घर बांधकामासाठी अनुदान या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. भविष्यात सर्व योजना बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदणी कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
समाजातल्या मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय गरीब कुटुंबीयांपर्यंत आपल्याला मुलभूत सोईसुविधा आणि सेवा कशा पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे करीत असताना सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण वैष्णवी बावस्कर यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
*****
Subscribe to:
Posts (Atom)
