मुंबई, दि. 31 : शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.२४ जुलै २०१७ पासून सुरू झाली आहे. दि. 31 ऑगस्ट रोजी दुपारी 4 पर्यंत 45 लाख 59 हजार 327शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली असून, 38 लाख 90 हजार 404 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
श्री. देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये ऑनलाईन भरण्यात येत आहेत. यात आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे. दि. 15 सप्टेंबर2017 ही अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment