मुंबई, दि. 30 : एकात्मिक बालविकास सेवा
योजनेंतर्गत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील
बालके, गरोदर स्तनदा माता यांना नियमित पूरक पोषण आहार देण्यात येतो. या
व्यतिरिक्त सॅम बालकांसाठी राज्यातील आदिवासी तसेच बिगर आदिवासी भागांमध्ये ग्राम
बालविकास केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे
यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरात सांगितले.
सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी राज्यात बालमृत्यूचे
प्रमाण रोखण्याबाबचा प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना श्रीमती मुंडे
बोलत होत्या.आदिवासी प्रकल्पांमध्ये अमृत आहार योजना सुरू असून ह्या योजनेंगर्तत
गरोदर स्तनदा मातांना एक वेळचा चैारस आहार देण्यात येतो. तसेच सहा महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना
आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी पुरविण्यात येतात. या अंतर्गत प्रतिदिन शाकाहारी
बालकांना दोन केळी व मांसाहारी बालकांसाठी १ अंडी देण्यात येत असल्याचे श्रीमती मुंडे यांनी
सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाश गजभिये यांनी
भाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment