मुंबई, दि. ८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘जालना जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल’ या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार दि.१० नोव्हेंबर सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांनी घेतली आहे.
जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात 176 गावांना वॉटर ग्रीडव्दारे पाणीपुरवठा, तसेच राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी संदर्भात केलेली कार्यवाही, पाण्याची बचत व्हावी यासाठी मीटरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे धोरण, सीड पार्क प्रकल्प, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी परसबाग, दुधाळ जनावरांच्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प व उपक्रमां विषयी श्री. बबनराव लोणीकर यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
०००

No comments:
Post a Comment