Tuesday, 30 October 2018

कौशल्य सेतू अभियानामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मिळणार रोजगाराची संधी - विनोद तावडे

कौशल्यसेतू अभियानातील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा

मुंबई, दि. 30 इयत्ता दहावीमध्ये नापास झाल्यावर बऱ्याचदा घरनातेवाईक आणि मित्र परिवाराकडून विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले जात नाही. मात्र आता इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमामुळे रोजगाराची संधी मिळणार असून कौशल्य सेतू अभियान’ हा उपक्रम देशभरात उल्लेखनीय ठरला असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
इयत्ता  दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाद्वारे करिअरची संधी उपलब्ध करून देणाऱ्या 'कौशल्यसेतू  अभियानातीलविद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा शिक्षण  मंत्री विनोद तावडे आणि कौशल्य विकास मंत्री  संभाजी  पाटील-निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विदयापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. तावडे बोलत होते. या कार्यक्रमाला तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघराजेश पांडेमुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु श्री. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. तावडे यावेळी म्हणालेआजच्या  युवकांना काळानुरुप रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. नापास’ हा शिक्का पुसून टाकण्यासाठी राज्य शासनाने राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करत या कौशल्य सेतू अभियानाद्वारे विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कौशल्य सेतू अभियानामध्ये इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. संपूर्ण राज्यात अशी १११ प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असून यामध्ये नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गतयशस्वी ॲकेडमी फॉर स्किल्स’ व नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी’ या दोन संस्थांच्या माध्यमातून सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येते.
बऱ्याचदा इयत्ता दहावीमध्ये नापासाचा शिक्का बसल्याने विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जातात. युवापिढीचे भवितव्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने कौशल्य सेतू अभियान’ सुरु केले आहे. या योजनेमुळे इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधण्याची संधी उपलब्ध झाल्याने स्किल इंडिया या महत्वाकांक्षी अभियानाला आणखी बळ मिळणार असून यामुळे देशाची युवा पिढी स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.
नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटी व यशस्वी स्किल्स या दोन संस्थांच्या माध्यमातून  या विद्यार्थ्यांना सहा महिने कालावधीसाठी मोबाईल रिपेअरिंगअसिस्टंट इलेक्ट्रिशियनऑटोमोबाईल सर्व्हिस टेक्निशियन (टू  अँड थ्री व्हीलर)मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगडीटीएच सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिस टेक्निशियन अशा विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर भर असलेले हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. आज मुंबई विदयापीठाच्या दीक्षांत सभागृहात सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
००००

No comments:

Post a Comment