नागपूर,दि.
1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत
उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट
छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता
अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत
आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019 ते 31
डिसेंबर, 2019 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या
लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका
पाठविण्यासाठी अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी, 2020
पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती
कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम
कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32
येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
****
No comments:
Post a Comment