विभागीय आयुक्त बिदरी यांच्या मार्गदर्शनात
अभिनव यश
नागपूर, दि. 18 : माझी वसुंधरा
अभियान 5.0 मध्ये नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषद आणि बेसा-पिपळा नगरपंचायतीला
तसेच वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर परिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. विभाग
स्तरावर चंद्रपूर महानगरपालिकेला आणि गडचिरोली, ब्रह्मपुरी, देवळी आणि खापा नगरपरिषदेला
विविध लोकसंख्या गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव यश प्राप्त झाले आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या
निर्सगाशी संबंधीत पंच तत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’5.0 हे राज्यातील 422 नागरी
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 1 जून 2024 ते
31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी
निसर्गाचे पंचमहाभूत भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश यामध्ये कामे केली व सर्व कामांचे
डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात आले. माझी वसुंधरा
अभियान 5.0 चा निकाल 17 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध लोकसंख्या
गटात जाहीर करण्यात आला.
माझी वसुंधरा अधियान 5.0 मध्ये गुणानुक्रमे उंच उडी श्रेणीमध्ये विविध
लोकसंख्या गटात नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषद आणि बेसा-पिपळा नगरपंचायतीला
तसेच वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर परिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
25 ते 40 हजार लोकसंख्या गटात बुटीबोरी नगरपरिषदेला, 15 ते 25 हजार लोकसंख्या गटात
देवळी नगरपरिषदेला तर 25 हजारापेक्षा कमी लोकसंख्या गटात बेसा-पिपळा नगरपंचायतीला प्रत्येकी
1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विभागस्तरावर अमृत गटामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेला रुपये 1.50 कोटींचा
पुरस्कार जाहीर झाला आहे. गडचिरोली, ब्रह्मपुरी, देवळी आणि खापा नगरपरिषदेला विविध
लोकसंख्या गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत. 40 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटात गडचिरोली
नगरपरिषद, 25 ते 40 हजार लोकसंख्या गटात ब्रम्हपुरी नगरपरिषद, 15 ते 25 हजार लोकसंख्या
गटात देवळी नगरपरिषद आणि 15 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात खापा नगरपरिषदेला
प्रत्येकी रुपये 75 लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
21 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुबंई
येथे एका शासनदार समारंभात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
00000

No comments:
Post a Comment