मुंबई, दि. 29 : ऑक्टोबर मध्ये प्रसारित होणा-या 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमासाठी 'विकास गावांचा' या विषयाकरिता जनतेकडून ई-मेल आणि व्हॉटस ॲपवर दि. 4 ऑक्टोबर 2017 पर्यंत प्रश्न मागविण्यात येत आहेत.
ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल, आरोग्य सेवा, शालेय शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था- जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या विषयांवर जनतेला प्रश्न विचारता येतील.
सदरचे प्रश्न mmb.dgipr@gmail.com तसेच 8291528952 या व्हॉटस अप क्रमांकावर पूर्ण नाव, पत्त्यासहित पाठवावेत असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
००००
No comments:
Post a Comment