मुंबई, दि. 2 :अरबी समुद्रात ओखी
नावाचे वादळ तयार झाले असून, ते सध्या मुंबईच्या समुद्रालगत
दक्षिणेकडे 1000 कि.मी वर स्थित आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत
ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांवरील समुद्र
खवळलेला असेल. त्यामुळे 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी मासेमारांनी सुमद्रात
मासेमारीसाठी जाऊ नये, लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये, असा
सतर्कतेचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
मुंबईसह सागरी किनाऱ्यांवर 4 तारखेला
अंशत: तसेच 5 तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते. 5 तारखेला मुंबई, कोकणात
सागरी भागात वाऱ्यांची तीव्रता अधिक असेल. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क असावे.
यामुळे किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होईल.
००००
No comments:
Post a Comment