मुंबई, दि. २: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास’ कार्यक्रमात
खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला यांची मुलाखत
आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सोमवार, दि. ४ डिसेंबर आणि मंगळवार, दि. ५ डिसेंबर
रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत
प्रसारित होणार आहे. ही मुलाखत संजय जोग यांनी घेतली आहे.
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापनेमागचा
उद्देश, महिला सक्षमीकरणासाठी समाजातील दुर्बल घटकांसाठी मंडळ राबवित
असलेल्या योजना, मधुबन हा ब्रँड नेमका काय आहे, खादी
ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजना व उपक्रम आदींविषयांची माहिती श्रीमती बागला
यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
0
0 0
No comments:
Post a Comment