Monday, 1 January 2018

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

मुंबई, दि. १ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे पहिले अध्यक्ष पाशा पटेल यांची  'कृषी मूल्य आयोग ध्येय व धोरणेया विषयावर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या मंगळवार दिनांक २ जानेवारी  २०१८ रोजी  सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत  मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी घेतली आहे.

राज्य शासनाने १५ एप्रिल २०१५ रोजी राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मालाला वाजवी भाव मिळून थेट ग्राहकांना रास्त दराने उपलब्ध व्हावे यासाठी सुरु करण्यात आलेला आठवडे बाजार तसेच या आयोगाची संरचना आणि कार्यप्रणाली, ही यंत्रणा कशाप्रकारे कार्यरत असून विविध विभागांचा समन्वय कसा केला जातो याबाबतची माहिती श्री. पाशा पटेल यांनी  जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment