Thursday, 26 April 2018

पंचवीस लाख क्विंटलहून अधिक तूर खरेदी - सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख


मुंबई, दि.26 : राज्यात आजपर्यंत १९२ तूर खरेदी केंद्रांवर २५ लाख ४७ हजार ८१७ क्विंटल तूर खरेदी  करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
तूर खरेदीला नुकतीच केंद्रशासनाने मुदतवाढ दिली असुन आता १५ मे पर्यंत तूर खरेदी करण्यात येईल. 2 लाख 4 हजार 483 इतक्या शेतकऱ्यांकडून ही तूर खरेदी करण्यात आली आहे.
            राज्यात  हमीभावाने हरभरा खरेदीला 1 मार्चपासून सुरुवात झाली असुन काल (24)  एप्रिल पर्यत 194 केंद्रांवर 22 हजार 656 शेतकऱ्यांकडून लाख दहा हजार 244क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर व हरभरा खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार वपणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
००००
शैलजा वाघ दांदळे/विसंअ

No comments:

Post a Comment