मुंबई, दि.26 : राज्यात आजपर्यंत १९२
तूर खरेदी केंद्रांवर २५ लाख ४७ हजार ८१७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन
मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
तूर खरेदीला नुकतीच केंद्रशासनाने मुदतवाढ दिली असुन आता १५ मे पर्यंत तूर खरेदी करण्यात येईल. 2 लाख 4 हजार 483 इतक्या शेतकऱ्यांकडून ही तूर खरेदी करण्यात आली आहे.
राज्यात हमीभावाने हरभरा खरेदीला 1 मार्चपासून सुरुवात झाली असुन काल (24) एप्रिल
पर्यत 194 केंद्रांवर 22 हजार 656
शेतकऱ्यांकडून ३ लाख दहा हजार 244क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर व हरभरा खरेदी
योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार वपणन
मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
००००
शैलजा
वाघ दांदळे/विसंअ
No comments:
Post a Comment