मुंबई,
दि. 30 : माहिती व जनसंपर्क
महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ‘सुजल महाराष्ट्र-निर्मल महाराष्ट्र’ या विषयावर
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री
वाहिनीवरून शुक्रवार दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे.
राज्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सुरू असलेले कामकाज,दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे
स्वप्न साकार करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, वॉटरग्रीड योजना, जलस्वराज्य कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण
पेयजल योजना,
जलयुक्त
शिवारमधील कामांचा सकारात्मक परिणाम तसेच पाणीपुरवठा योजनांची सद्य:स्थिती
संदर्भात 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून
सविस्तर माहिती श्री. लोणीकर यांनी
कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment