Saturday, 3 November 2018

कै. बी. जी. देशमुख निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबईदि. 3 : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निबंधाची प्रवेशिका दि. 31डिसेंबर 2018 पर्यंत पाठवावीअसे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
            भारतीय लोक प्रशासन संस्थामहाराष्ट्र विभागीय शाखेकडून दरवर्षी कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार सन 2018- 2019 या वर्षाच्या निबंध स्पर्धेसाठी बँकांच्या एनपीएमुळे (अनुत्पादक मालमत्ता) बाधित होणारा देशाचा विकास’ (एनपीए इन बँक्स अफेक्टिंग द डेव्हलपमेंट ऑफ इंडिया), ‘राज्यातील  शेतकऱ्यांची  स्थिती आणि त्यांच्या स्थायी विकासासाठी करावयाच्या प्रभावी उपाय योजनांची गरज’ (फार्मर्स प्लाईट इन द स्टेट ॲण्ड इफेक्टिव्ह मेझर्स नीड टू बी अंडरटेकन फॉर देअर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी निवारा व या योजनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी’ (हाऊसिंग फॉर एव्हरी वन अंडर प्राईम मिनिस्टर्स आवास योजना ॲण्ड इट्स इम्प्लिमेंटेशन इन महाराष्ट्र स्टेट)  हे तीन विषय निवडण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी पहिले पारितो‍षिक 7 हजार पाचशे रुपये,  दुसरे पारितोषिक 6 हजार रुपयेतिसरे 3 हजार पाचशे तर उत्तेजनार्थ 2 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
            निबंध हा ठरवून दिलेल्या कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून असावा. 3 हजार शब्दांपेक्षा कमी आणि 5 हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा. निबंध हा विषयानुसार विश्लेषणात्मक,संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर टोपणनाव लिहून चार प्रतीत सादर करावा. स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये.
            निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. पारितोषिक देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्यावतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत पारितोषिक विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ पारितोषक प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यात पात्र असणार नाही.
            निबंधावर टोपणनाव लिहून निबंधाच्या चार प्रती असलेला लिफाफाटोपणनाव व त्याबाबतचे स्पर्धकाचे संपूर्ण नाव व पत्ता असलेला वेगळा लिफाफा एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर कै. श्री. बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा,  2018-2019 असे नमूद करावे व तो मानद सचिवभारतीय लोक प्रशासन संस्थामहाराष्ट्र विभागीय शाखातळमजलाबँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूलामंत्रालयमादाम कामा मार्गहुतात्मा राजगुरु चौकमुंबई 400032. या पत्त्यावर दिनांक 31 डिसेंबर 2018 पर्यंत पाठवावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 22793430 (थेट) किंवा22024243/22854156 विस्तारित क्रमांक 3430 वर किंवा ईमेल: js.mrb-iipa@gov.in द्वारे संपर्क साधावाअसेही आवाहन करण्यात आले आहे.
0000

No comments:

Post a Comment