मुंबई, दि. 30 : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत यापुढे राज्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहेत, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत सदस्य छगन भुजबळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. लोणीकर बोलत होते. ते म्हणाले, लासलगाव विंचूरसह 13 व येवला तालुक्यातील 38 गावांतील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नाशिकच्या जिल्हा नियोजन समितीमार्फत या योजनेसाठी निधीची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव आहे.
श्री. लोणीकर म्हणाले, राज्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मोठ्या वीज बिलामुळे चालविण्यात अडचणी येतात. त्यावर उपाय म्हणून या योजना सौरऊर्जेवर रुपांतरित करण्यात येतील. रात्रंदिवस पंप चालविणे आवश्यक असणाऱ्या मोठ्या योजनांमध्ये सौर ऊर्जा व महावितरणची वीज अशा दुहेरी पद्धतीने या योजना चालविण्यात येतील.
या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, गणपतराव देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, बच्चू कडू, पांडुरंग बरोरा यांनीही सहभाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment