* राज्यातील तीन हजार सर्वोत्तम कल्पनांची स्पर्धा
* राज्यातील स्टार्टअप हिरो, टॉप महिला उद्योजक पुरस्कार
नागपूर, दि. 02 : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, स्टार्टअप इंडिया आणि इंडस्ट्रियल पॉलिसी विभागातर्फे स्टार्टअप इंडिया यात्रेचे आयोजन करण्यात आले असून उद्या शनिवार, दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता ग्रॅण्ड फिनालेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील तीन हजार सर्वोत्तम कल्पनांची स्पर्धा घेवून राज्यातील स्टार्टअप हिरो व टॉप महिला उद्योजकाची निवड करण्यात येणार आहे. यांच्या उपस्थितीत विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रोद्योगिक संस्था (व्हीएनआयटी) येथे आयोजन करण्यात आले आहे.
स्टार्टअप इंडिया यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील स्टार्टअप व नवकल्पनांचे पोषण करण्यासाठी इन्क्यूबेशन सेंटरची स्थापना करण्यासाठी 16 विद्यापीठ आणि संस्थांना उद्देशपत्र देण्यात आले आहे. स्टार्टअप यात्रा राजभवन येथून स्टार्टअप व्हॅन ध्वजांकित करण्यात आली. या व्हॅनने राज्यातील 26 जिल्ह्यामधून प्रवास केला आहे. स्टार्टअप यात्रेविषयी जागरुकता पसरविणे, विद्यार्थ्यांना तसेच तरुण उद्योजकांना बूट कॅम्प सत्रामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या कल्पनांचा विचार करणे हा या मागचा उद्देश आहे.
बूट कॅम्पमध्ये सहाशेहून अधिक स्पर्धकांनी आपल्या कल्पना ज्युरीसमोर सादर केल्या. व्हॅन स्टॉप, बूट कॅम्प आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे दोन हजारहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. नागपूर येथील ग्रॅण्ड फिनालेमध्ये महाराष्ट्रीतील सुमारे 300 सर्वोत्तम स्पर्धकांची स्पर्धा घेण्यात येईल व त्यातून स्टार्टअप हिरो, टॉप महिला उद्योजक यासारखे पारितोषिक देण्यात येणार आहे.
***
No comments:
Post a Comment