नागपूर दि.3 : आज शाळकरी वयातील मुले व तरुणाई मोबाईल व संगणकावरील खेळ खेळतात. त्यांनी शारीरीक खेळ खेळण्यासाठी मैदानावर यावे. या उद्देशाने सीएम चषक या देशातील सर्वात मोठ्या क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यत राज्यात या स्पर्धेसाठी 24 लाख खेळाडूंची नोंदणी झाली आहे. याच गतीने स्पर्धेसाठी नोंदणी होत गेल्यास लवकरच याची गिनीज बुकमध्ये नोंद होईल असे आश्वासक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात प्रतापनगर येथील क्रीडागंणात आयोजित सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महापौर नंदाताई जिचकार, लघु उदयोग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी,इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, रमेश भंडारी,शिवानी दाणी, स्पर्धेच्या संयोजिका राणी व्दिवेदी , सारंग कदम उपस्थित होते.
खेळ व सास्कृंतीक क्षेत्रात तरुणाई रमते . नवोदित खेळाडुंना व्यासपीठ मिळावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. खेळामुळे जीवनात खिलाडुवृत्ती निर्माण होते,संघ भावना वाढीस लागते.आयुष्यातील यश अपयशाकडे खेळाडू वृत्तीने पाहण्याचा दृष्ट्रीकोन तयार होतो. खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वागीण विकास होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तरुणाईनी सुदृढ राहण्यासाठी खेळले पाहीजे. मंदिरापेक्षा मैदानात जावे, असे स्वामी विवेकानंद सांगून गेले. स्वामी विवेकानंदाचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातुन तरुणाईपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी फलंदाजी करून मुख्यमंत्र्यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले.
सीएम चषक या स्पर्धेसाठी दक्षिण – पश्चिम नागपूर क्षेत्रातुन पाच हजार खेळाडूंनी नोंदणी केली ती पंधरा हजारापर्यत होण्याची अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल, तिरळे कुणबी समाजाला समाजभवन व सिंधी समाजाला मालकी हक्काचे पट्टे दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचा विविध संस्थांनी सत्कार केला.
*****
No comments:
Post a Comment