लोकसभा निवडणूक-2019
मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेल्या 147 पैकी 31उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतली असून, 116 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 147 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 147 पैकी 31 उमेदवारांनी माघार घेतली. मतदार संघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघ 14, रामटेक मतदार संघात 16, नागपूर मतदार संघात 30, भंडारा-गोंदिया मतदार संघ- 14, गडचिरोली- चिमूर मतदार संघात 5, चंद्रपूर मतदार संघात 13 आणि यवतमाळ- वाशीम मतदार संघात 24 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदार संघात छाननीअंती 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा- 13, अकोला 12, अमरावती 34, हिंगोली34, नांदेड 55, परभणी 21, बीड 53, उस्मानाबाद 20, लातूर 12 आणि सोलापूर 24.
००००
No comments:
Post a Comment