Monday 29 April 2019

उष्माघातापासून बचावासाठी तातडीच्या उपाययोजना करा - अश्विन मुदगल


*        मे महिन्यात शाळा व महाविद्यालय बंद
*        परीक्षा, अतिरिक्त वर्ग सकाळी 11.00 पर्यंत
*         सीबीएसई, आयसीएसई शाळा सुद्धा बंद राहतील

नागपूर,  दि. 29  :  हवामान खात्याने विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता अधिक राहणार असल्याचे स्पष्ट केले असून उष्ण लहरीचा घातक परिणाम आरोग्यावर पडण्याचे संकेत आहेत. उष्माघातापासून बचाव करण्याकरिता तातडीच्या उपाययोजनांतर्गत मे महिन्यात सर्व शासकीय, अशासकीय, खाजगी शाळा व विद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी  दिले आहेत.
वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना अतिप्रमाणात बसत आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिक तापमानाच्या कालावधीत विशेषत: मे महिन्यात सर्व शासकीय, अशासकीय, खाजगी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी  दिले आहेत. अतिरिक्त वर्ग किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात सकाळी 11.00 वाजेपर्यंतच शाळा व महाविद्यालये सुरु ठेवावीत. तसेच खाजगी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा व महाविद्यालयांच्या प्रायार्यांनी मे महिन्यात शाळा बंद ठेवण्याबाबतच्या सूचना शिक्षण उपसंचालक तथा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी  देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.
***

No comments:

Post a Comment