Thursday 27 February 2020

दैनंदिन व्यवहारात मराठीला प्राधान्य द्या - डॉ. विभावरी डांगे

विभागीय माहिती केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा

नागपूर, दि. 27 प्रत्येक मराठी माणसाने दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करताना मराठी आणि इतर भाषेतील अलंकार समजून घेतले पाहिजेत. मराठी भाषेला काळानुरुप इतर भाषांनी समृद्ध केले असले तरीही दैनंदिन व्यवहरात मराठी भाषेला प्राधान्य देण्याचे आवाहन विभागीय ग्रंथालयाच्या वरिष्ठ ग्रंथपाल डॉ. विभावरी डांगे यांनी केले.
       मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विभागीय माहिती केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सहाय्यक संचालक शैलजा वाघ-दांदळेजिल्हा माहिती अधिकारी विशेष कार्य अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यांनी अवांतर वाचन केले पाहिजे. त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. देशावर परदेशी आक्रमणे झाली. परिणामी मराठी भाषेवर इतर भाषांचा प्रभाव पडला. ती समृद्ध झाली. मात्र इंग्रजी भाषेमुळे अनेकांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाले असले तरीही मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करावा. इंग्रजी भाषेचा वापर वाढल्यामुळे मराठी भाषा महानगरापेक्षा सध्या ग्रामीण भागात मराठी जास्त वापरली जातेअसे डॉ. डांगे म्हणाल्या.
       विविध शब्दांचे महत्त्व त्यांचे अर्थही त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून सांगताना संपन्न मराठी भाषेच्या शब्दश्रीमंतीवर भाष्य केले. तसेच मराठी माणसाने मराठीशिवाय इतर भाषेचा अट्टाहास करु नये. समाजात मराठी भाषा ही एकमेकांचे सुख- दु;ख वाटून घेण्याचे काम करते. प्रमाण भाषा ही  व्यवहारातील असली तरीही मराठीला प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले.    
       मराठी भाषा दिन साजरा करण्यामागची कुसुमाग्रजांची भूमिका समजावून सांगताना सहाय्यक संचालक  श्रीमती शैलजा वाघ- दांदळे यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. सद्य:स्थितीत मराठीत विविध भाषेचे शब्द वापरतो हा भाषिक मोठेपणा आहे. भाषा भगिनी असतात. त्या सोबत असल्याने भाषेचा अभिमान असणे स्वाभाविक आहे. कारण भाषा ही केवळ भाषा नसून एक संस्कृती असते. एक संस्कार असतो. कोणतीही भाषा ही इतर भाषेचा दुस्वास करत नाही. सद्य:स्थितीत समाजमाध्यमांवर व्यक्त होत असताना इंग्रजी भाषेचा वापर जास्त होत असल्यामुळे मातृभाषा व्यवस्थित बोलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
       मराठी भाषा बोलताना ती स्वच्छसरळ आणि स्पष्ट बोलता आली पाहिजे. साहित्याचे नऊ रस भाषेमध्ये आहेत. सतत वाचल्यामुळे माणूस समृद्ध बनतो. त्यामुळे मराठी भाषेचा व्यवहारात वापर वाढायला हवाअसे सांगून त्यांनी कसं सांगू मुला’ ही कविता सादर केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविलेला आहे. प्रत्येकाला मातृभाषेचा अभिमान असायला हवा. दैनंदिन व्यवहारात इंग्रजी भाषेचा वापर कामापुरता व्हावा. मात्रबोलताना मराठी भाषेतच संवाद साधा.  मराठी बोलण्यातून आत्मियता वाढते. कुटुंबही बोलीभाषेत एकसंघ ठेवता येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी तर मराठीतून अवांतर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून मराठी भाषेचा आग्रह धरण्याचा सल्ला दिला.
       विभागीय माहिती केंद्राच्या अभ्यासिकेमध्ये येणा-या दक्षता आडसेनवनीत कुर्वेमिनाक्षी बागडेतेजस्विनी बोबडेमाहिती सहायक अपर्णा यावलकरमाहिती केंद्रातील कविता फाले यांनी  काव्यवाचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषा दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन करण्यात आले. प्रास्ताविक कविता फाले यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा यावलकर यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजि कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
****** 

No comments:

Post a Comment