Monday 15 March 2021

समाजमाध्यमांवरील त्या पोस्ट फसव्या आर्थिक मदतीचे आमिष : नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन नागपूर, दि. 15 : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात समाजकंटकांनी ‘सोशल मीडियाद्वारे फसव्या पोस्ट टाकून नागरिकांना आमिष देणे सुरु केले आहे. या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन केले आहे. 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले, त्या व्यक्तीच्या विधवेला महिला व बाल विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जिजामाता/जिजाऊ या योजनेतंर्गत 50 हजार रुपये मदत मिळणार असल्याची पोस्ट ‘व्हाट्स-ॲप’ वर फिरत आहे. मात्र हा संदेश पूर्णत: चुकीचा बनावट असून अशी कुठलीच योजना विभागामार्फत कार्यान्वित नाही, असे महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्तांनी 10 मार्च रोजी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. वेगाने ‘व्हायरल’ होत असलेल्या अशाप्रकारच्या संदेशामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी केले आहे. ********

No comments:

Post a Comment