Wednesday 14 April 2021

‘जनता’च्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यत पोहचतील – पालकमंत्री

ल, असे एकही वृत्तपत्र नव्हते. मराठी वृत्तपत्रांच्या साखळीमध्ये डॉ. * जनता खंडाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन * पालकमंत्र्यांची दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती नागपूर, दि.14 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिकट परिस्थितीला समर्थपणे तोंड देत, अस्पृश्य समाजात त्यांच्या लेखनीतून त्यांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचतील आणि समाज जागृतीचे कार्य अखंडपणे सुरु राहील. बाबासाहेबांच्या पत्रकारितेने जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने संपादित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड क्रमांक 3-1 जनता या खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी प्रास्ताविकात डॉ. राऊत बोलत होते. या प्रकाशन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा समितीचे उपाध्यक्ष प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ.कृष्णा कांबळे, डॉ. भालचंद्र मुणगेकर आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते. शतकभरापूर्वी भारतीय संस्कृतीत अस्पृश्य तसेच बहिष्कृत समाजाची ठामपणे बाजू घेईबाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत व जनता पत्र मुंबईतून प्रकाशित करत बहिष्कृतांचा आवाज बुलंद केला. त्यानंतर बाबासाहेबांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी जनता हे पाक्षिक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. 1920 साली मूकनायक, 1927 साली बहिष्कृत भारत, 1930 साली जनता आणि 1956 साली प्रबुद्ध भारत या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी जनतेमध्ये प्रबोधन घडवून आणण्याचे अतुलनीय कार्य केले. याच काळात आंदोलने आणि विचार या दोन्ही साधनांचा अत्यंत समृद्ध आणि प्रभावी उपयोग त्यांनी त्याकाळी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर मोठा संघर्ष केला असून, त्यांच्या संघर्षातून प्रत्येक विचार हा समाजजागृतीचे कार्य करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या उर्वरित लेखन साहित्याचा शोध घेऊन ते संपूर्ण साहित्य प्रकाशित करण्याची आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी डॉ. राऊत यांनी केली. अप्रकाशित लेखन साहित्याचे प्रकाशन केल्यानंतर समाजातील विविध घटक, समाजातील भाग, विद्यार्थी, प्राध्यापक अर्थतज्ज्ञ अशा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'जनता' मधील हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे संदर्भमूल्य असलेला हा ठेवा देशाच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. हा धगधगता दस्तावेज पुस्तकरूपात प्रकाशित होत आहे याचा खूप आनंद होत असल्याचे श्री. राऊत यांनी यावेळी सांगितले. आंबेडकरी चळवळीचे आंबेडकर कालीन दीर्घकाळ प्रवास करणारे साप्ताहिक वृत्तपत्र म्हणून ‘जनता’चा उल्लेख केला जातो. या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थितीचे यामधून आंबेडकरी दृष्टीने केलेले विश्लेषण यात बघायला मिळते. तसेच भारतातील तत्कालीन वेगवेगळ्या विचारांच्या चळवळीचा आणि घटनांचा तपशील व संदर्भ यात पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने तो त्या काळातील घडामोडींचा दस्तऐवज म्हणजेच ऐतिहासिक ठेवा आहे. ******

No comments:

Post a Comment