Monday 31 May 2021

सिंचन योजनेच्या कामास गती द्या - सुनील केद्रार

सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देतानांच कालमर्यादा निश्चित करा, असे निर्देश सूनील केदार यांनी आज येथे दिलेत. नवेगाव खैरी पुरक कालवा उपसा सिचन योजनेचा आढावा पशुसंवर्धन मंत्री केदार व आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख्य उपस्थितीत सिंचन भवन येथे घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक विजयकुमार मोहिते, मुख्य अभियंता ब. शं. स्वामी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चौराई धरणामुळे उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पेंच प्रकल्पांतर्गत उपाययोजना प्रस्तावित आहे.नागपूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा टंचाईचा प्रश्न उद्भवत आहे. नवेगाव खैरी उपसा सिंचनामुळे मुबलक पाणी नागपूर शहरास उपलब्ध होईल, असे श्री. केदार यांनी सांगितले. दिवसेंदिवस नागपूर शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यादृष्टीने आता पासूनच पाण्याचे स्त्रोत तयार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. नवेगाव खैरी पूरक कालावा उपसा सिंचन प्रकल्पामुळे 15 टिएमसी पाणी मिळणार असून यापैकी 7 टिएमसी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी महत्त्वपूर्ण अशा कन्हान नदी वळण योजना आणि इतर सात आदिवासी भागातील गावांना उपसा सिंचन पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेस निधी कमी पडू देणार नाही सिंचन प्रकल्पाची संपूर्ण माहिती तयार करुन अपूर्ण प्रकल्पाची कामे, प्रशासकीय मान्यता व सुधारित प्रशासकीय मान्यता प्राधान्याने घेण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सचिवालयात पाठविण्याच्या सूचना देवून सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा सिंचन योजनेच्या कामाला प्राधान्य दिल्यास सावनेर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह पाणी सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. सिंचनासाठी कायमस्वरुपी सुविधा निर्माण होणार असल्यामुळे ही योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात येणार असून, यासंदर्भात निधी उपलब्ध करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. कोच्छी बॅरेज प्रकल्पामुळे सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. मध्य प्रदेशातील पेंच नदीवरील सिंचन प्रकल्पामुळे निर्माण झालेला सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे. कन्हान नदीवर रबर डॅम बाधण्यासाठी सन 2020-2021 साठी 1 हजार कोटीचा निधी मंजूर असून अंतर्गत तीन भागांत करावयाच्या उपाययोजनांना दुष्काळ निवारण कार्यक्रमांतर्गत तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याचे माहिती श्री. मोहिते यांनी यावेळी बैठकीत दिली.

No comments:

Post a Comment