नागपूर, दि. 23 : डॉ. रविंद्र कोल्हे व स्मिता कोल्हे या दापंत्यांनी अतिदुर्गम आदिवासी मेळघाट भागातील अनेक आदिवासी कुटूंबांना
आरोग्य सुविधा देवून जीवदान दिले आहे.
त्यांनी केलेले कार्य समाज कधीही विसरणार नाही . अशा दापंत्यांचा सन्मान करतांना
मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज
केले.
नागपूर येथील साई सभागृहात आज
सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ति केंद्रातर्फे डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ.
स्मिता कोल्हे दापंत्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शाल,
श्रीफळ, मानचिन्ह व एक लाखाचा धनादेश देवून सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत
होते. याप्रसंगी व्यासपीठावर वने व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. कृपाल
तुमाने, रुपाताई कुलकर्णी, ॲङ मामा गडकरी, विकास झाडे उपस्थित होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की,
आदिवासींसाठी डॉ. रविंद्र व स्मिता कोल्हे
यांनी प्रामाणिकपणे काम केले असून अनेक आदिवासींचे जीवन जगणे सुहाय्य केले आहे. कोल्हे
दापंत्यांना यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यांनी आदिवासी
समाजासाठी केलेले काम हे जनता विसरु शकत
नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की,
आदिवासी भागातील आदिवासींचे जीवनमान सुसहाय्य करण्यासाठी त्यांना वनावर आधारित
रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. त्यामुळे आदिवासींचे सामाजिक, आर्थिक परिवर्तन होऊन पर्यावरणाचा
संतुलनही राखले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे वित्त आणि नियोजन व वने
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, समाजाला आज डॉ. रविंद्र व डॉ. स्मिता कोल्हे
यांच्या विचारांची गरज असून त्यांनी मेळघाट सारख्या आदिवासी भागात आरोग्या बरोबरच
कृषीचे काम हे कौतुकास्पद असून त्यांचे
मनपुर्वक अभिनंदन करतो असेही, त्यांनी सांगितले.
मुनगंटीवार पुढे म्हणाले की,
समाजात आज अनेक व्यक्ति स्वत: साठी जगतात परंतू डॉ. रविंद्र व डॉ. स्मिता कोल्हे
यांनी आपले संपूर्ण जीवन आदिवासींच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. त्यांना अनेक
संकटातून जावे लागले असून अशा सेवाभावी
कार्याला जनतेनेही साथ द्यावी. शासन त्यांच्या पाठीशी असून त्यांनी सुचविलेले विज
व इतर कामे लवकरच पूर्ण करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना डॉ. रविंद्र कोल्हे म्हणाले की,
आदिवासी भागात काम करतांना अनेक अडचणी आल्या वीज, रस्ते या गंभीर समस्येतून मार्ग
काढत आदिवासींना आरोग्य व कृषी सुविधा पुरविण्यासाठी आपला प्रयत्न होता. यासाठी
डॉ. गिरीश गांधी यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळे मी आदिवासींच्या सेवा करण्यात
यशस्वी होवू शकलो. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याकाळी 40 किलोमीटरचा
रस्ता तयार करुन दिल्यामुळे आमचे जीवन
सुसहय झाले आहे.
यावेळी डॉ. स्मिता कोल्हे यांनी आदिवासी भागात काम करतांना अनेक अडचणी
आल्या व त्यावर कशी मात केली हे अनेक उदाहरणांसह सांगीतले.
0000
No comments:
Post a Comment