Friday 21 April 2017

अनुभवाच्या आदान-प्रदानासाठी नागरी सेवा दिनाचे विशेष महत्त्व -अनूप कुमार


नागपूर, दि. 21 : शासनाच्या विविध विभागातील योजनांच्या अंमलबजावणीतील अनुभवांची तसेच विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी नागरी सेवा दिनाचे आयोजन उपयुक्त आहे. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
विभागीय आयुक्त  कार्यालयामध्ये आज 11वा नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम्, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, पोस्टमास्टर जनरल मरीअम्मा थॉमस, रेव्हेन्यू खात्याचे राजकुमार घोष, उपायुक्त जितेंद्र पापळकर, पराग सोमण, डी. सी. पी. दीपाली मसिरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे तसेच नागरी सेवेतील इतर अधिकारी उपस्थित होते.
नागरी सेवांमध्ये येण्यासाठी युवापिढी प्रयत्न करीत आहे. नागरी सेवा दिनानिमित्ताने त्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल व युवकांतून कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण होऊन देशाच्या विकासाला नवी दिशा प्राप्त होईल असे सांगून विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन, डिजिटल पेमेंट, डीजिधन, जनधन योजनेसारख्या विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत व त्या यशस्वीपणे पूर्ण होत आहेत. भविष्यामध्ये शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व यशस्वीपणे राबविण्यासाठी शासनातील विविध विभागांच्या अधिकारी वर्गाने ‘रिफॉर्म’, ‘परफॉर्म व ‘ट्रान्सफॉर्म’ या मंत्राप्रमाणे कार्य करणे गरजेचे आहे.
रेल्वे, पोस्ट ऑफिस, महसूल, महानगरपालिका, परिवहन विभाग तसेच पोलिस विभागातील उपस्थित अधिकारी वर्गाने विभागातील नवीन योजना, जनतेला होणारा लाभ व योजनांची यशस्वीपणे होत असलेली अंमलबजावणी याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डीसीपी दीपाली मसिरकर यांनी मानले.
*****

No comments:

Post a Comment