Thursday 31 August 2017

कर्जमाफीसाठी आतापर्यंत 45 लाख 59 हजार 327 शेतकऱ्यांची नोंदणी -सहकार मंत्री सुभाष देशमुख



            मुंबईदि. 31  शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया  दि.२४ जुलै २०१७ पासून  सुरू झाली आहे.  दि. 31  ऑगस्ट  रोजी दुपारी 4  पर्यंत  45 लाख 59  हजार  327शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली असून, 38  लाख 90   हजार  404  शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेतअशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
      श्री. देशमुख म्हणालेछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये ऑनलाईन भरण्यात येत आहेत. यात आपले सरकार केंद्रनागरिक सुविधा केंद्रसंग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे. दि. 15 सप्टेंबर2017 ही अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment